शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

५३ टक्के रुग्ण ४० वर्षांखालील, तरीही लसीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. दररोज दीड हजारच्या वर रुग्ण आढळत आहेत. यामध्ये ४० वर्षांखालील नागरिकांची ...

चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. दररोज दीड हजारच्या वर रुग्ण आढळत आहेत. यामध्ये ४० वर्षांखालील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मृतांच्या आकडेवारीमध्येही ४० वर्षांखालील नागरिकांचा समावेश दिसून येत आहे. परंतु, तरीही शासनाकडून केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ६१७, ६ ते १८ वयोगटातील ३७६४, १९ ते ४० वयोगटातील १९ हजार ६१, ४१ ते ६० वयोगटातील १५ हजार १०४, ६१ वर्षांवरील ४ हजार ८९८ रुग्णांची नोंद करण्यात आली. या आकडेवारीचा विचार केल्यास ० ते ४० वयोगटातील सुमारे २३ हजार ४४२ नागरिक बाधित झाले आहेत. ही आकडेवारी ४५ वर्षांवरील रुग्णांच्या आकडेवारीपेक्षा अधिक आहे. बहुतांश ज्येष्ठांचे घराबाहेर पडणे बंद आहे. परंतु, जीवनावश्यक वस्तू असो किंवा इतर कामासाठी युवकच बाहेर पडत आहेत. त्यामुळे ज्येष्ठांपेक्षा युवकच अधिक बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचा मृत्यूही झाला आहे. १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला असला तरीसुद्धा ४५ वर्षांखालील नागरिकांसाठीच लस उपलब्ध नसल्याने त्यांनी पुन्हा किती प्रतीक्षा करावी लागणार हे वेळच सांगणार आहे.

-----

कोट

लस घेतल्यानंतर दीड महिन्यात इम्युनिटी तयार होत असते. लस घेतल्यानंतरही जवळपास ३० टक्के इन्फेशन होण्याची भीती असते. त्यामुळे लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतरही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. बहुतांश युवक गाफील असतात. मात्र, आपल्यामुळे कुटुंबाला बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

-डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

बॉक्स

लस मिळेपर्यंत अशी घ्या काळजी

कोरोनामुळे ४० वर्षांखालील युवकांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे युवकांनी गाफील राहू नये. विनाकारण घराबाहेर पळणे टाळणे. आवश्यक काम असेलच तरच मास्क घालून बाहेर पडावे. घोळका करून गप्पा करणे टाळावे, दररोज सायंकाळी गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.

अनेकजण शहरातील परिस्थिती पाहण्याच्या उद्देशाने सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडतात. मात्र, यामुळेही अनेकांना बाधा होत आहे. तर काहीजण केवळ खर्रा खाण्याच्या उद्देशाने बाहेर जातात. परंतु, एका खर्रामुळे राजुरा तालुक्यात चारजण बाधित झाल्याचा प्रकारही घटला आहे.

बॉक्स

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण रखडले

शासनातर्फे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याभरात ४५ केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. विविध व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून, दुसरा बुस्टर डोस घ्यायचा आहे. तर बहुतेक ४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिला व दुसराही डोस बाकी आहे. परंतु, जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने अनेक केंद्रावर लसच उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश केंद्र बंद अवस्थेत आहेत.