शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील वन्यप्राण्यासाठी पाणवठे तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 22:35 IST

जळगाव जामोद- वनपरिक्षेत्राधिकारी यांनी सातपुड्याच्या जंगलामध्ये नैसर्गिक १० पानवठे निर्माण करुन वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

वनविभागाचे प्रयत्न: सामाजिक संस्थांचीही मदतजळगाव जामोद : उन्हाळ्यात सातपुड्यातील सर्व नदया-नाले आटून जातात. अशावेळी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागते. आणि या भटकंतीमध्ये अनेकदा हे वन्यप्राणी लोकवस्तीतही भटकतात तर काही पाण्याअभावी मृत्यू पावतात. त्यासाठी जळगाव जामोद वनपरिक्षेत्राधिकारी यांनी संभाव्य दखल घेवून सातपुड्याच्या जंगलामध्ये नैसर्गिक १० पानवठे निर्माण करुन वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.तालुक्याच्या उत्तरेस पूर्ण सातपुडा पर्वत असून या सातपुड्यात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. यामध्ये वाघ, बिबट, अस्वल, हरिण, रानडुक्कर, निलगाय, सांबर, तडसे इत्यादी वन्यप्राण्यांसह पक्ष्यांचेही मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात हिरवळ आणि नदी नाल्यांनी खुळाळणारा सातपुडा उन्हाळ्यात एकदम रुक्ष वाळवंटासारखा होतो. नदयांचे-नाल्यांचे पाणी आटून जाते. झरेही कोरडे पडतात. अशा परिस्थितीत वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी पंचाईत होते. हे प्राणी मग लोकवस्तीकडे धाव घेतात आणि अशावेळी त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांनी जंगल सोडू नये त्यासाठी जंगलातच कृत्रीम परंतु एकदम नैसर्गिक वाटणारे पानवठे निर्माण करुन त्यांची तहान भागवण्याची व्यवस्था सातपुड्यात जळगाव वनविभागाने केली आहे.या वनपरिक्षेत्रात एकूण जामोद, खांडवी, जळगाव आणि वरवट हे चार बिट आहेत. त्यामध्ये खांडवी बिटमध्ये ३, जळगाव बीट ३, जामोद २ आणि वरवट बिटमध्ये २ असे एकूण १० पानवठे तयार करण्यात आले आणि या प्रत्येक पानवठ्यामध्ये दर ५ ते ६ दिवसानंतर ३ हजार लिटरचे १ टँकर पाणी सोडण्यात येते आणि मग वन्यप्राण्यांना पिण्यास सोयीचे ठरते. हे १० पानवठे सातपुड्यातील निमखेडी, हनवतखेड, इस्लामपूर, पूर्व रायपूर, पश्चीम रायपूर, भेंडवळ, पिंगळी आणि जामोद या परिसरात तयार करण्यात आले आहेत.असे बनवतात नैसर्गिक पानवठे४वन्यप्राण्यांना कुठेही कृत्रीमतेचा आभास होवू नये. त्यांनी नि:संकोचपणे पाणी पिण्यासाठी यावे म्हणून पानवठे बनवितांना विशेष काळजी घेतली जाते. यासाठी साडेपाच मिटर व्यासाचा खड्डा खोदला जातो. त्यामध्ये खाली काळीमाती त्यावर गवत टाकतात. गवतावर पॉलीथीन अंथरले जाते आणि त्यावर बारीक दगड, वाळू आणि थोडी काळी माती टाकण्यात येते. त्यामुळे हे पानवठे एकदम नैसर्गिक वाटतात आणि त्यामध्ये पाणी सुध्दा साचुन राहते. सदर पानवठे ज्या भागात वन्यप्राण्यांचा अधिक वावर आहे अशा भागामध्ये घेण्यात आले. त्यासाठी सन्मानग्रुपचे हि भरपूर सहकार्य मिळाले. त्यांनी जागा शोधण्यास मदत केली तर सदर पानवठ्यामध्ये एप्रील, मे आणि जून असे दोन ते अडीच महिने जोपर्यंत पाऊस पडत नाही. तोपर्यंत टँकरने पाणी सोडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्राधिकारी नवनाथ कांबळे यांनी सांगितले.