शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदापासून वंचित तीन मतदारसंघ

By admin | Updated: October 29, 2014 00:24 IST

बुलडाणा जिल्ह्यातील भाजपचे तिनही आमदार मंत्रीपदाचे दावेदार.

बुलडाणा : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव, जळगाव जामोद व मलकापूर या तीन मतदारसंघामध्ये कधीही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले नाही. काँग्रेसची सत्ता असतानाही या मतदारसंघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही व युती सरकारच्या काळातही हेच चित्र कायम राहिले. यावेळी मात्र राज्यात भाजपाची सत्ता आली असून, या तीनही मतदारसंघात भाजपाचे आमदार विजयी झाले आहे. हे तीनही आमदार पक्षामध्ये मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असल्यामुळे आता मुख्यमंत्री ठरला, मंत्रिपद कुणाला, याची चर्चा जिल्हाभरात जोर धरू लागली आहे. या तीनही दावेदारांमध्ये विधान परिषदेचे आमदार भाऊसाहेब फुंडकर हे सर्वात प्रबळ दावेदार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले आमदार फुंडकर हे भाजपाचा बहुजन चेहरा म्हणून ओळखले जातात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद, पणन महासंघाचे संचालक, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, लोकसभा व विधानसभेचे सदस्य व आता विधान परिषदेचे सदस्य असा दीर्घ अनुभव असलेले आ. फुंडकर हे पश्‍चिम वर्‍हाडात आपली ताकद ठेवून आहे. यावेळी खामगाव मतदारसंघातून काँग्रेसची सत्ता हद्दपार करीत त्यांनी अँड. आकाश फुंडकर यांना विजय मिळवून दिला व भाजपाचा एक आमदार वाढला त्यामुळे येणार्‍या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी निश्‍चित मानली जात आहे. कदाचित मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास ते वरिष्ठ सभागृहाचे सभापती होऊ शकतात, असाही मतप्रवाह भाजपामध्ये आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून जनसंघाचा गड व भाजपाचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मलकापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या आमदार चैनसुख संचेती यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, ही मागणी पक्षश्रेष्ठीकडे भाजपा कार्यकर्ते करीत आहेत. आमदार चैनसुख संचेती यांनी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावर पक्षाची मजबूत बांधणी केली व वाढवला त्याचबरोबर मतदारसंघात दहा हजार कोटी रुपयांच्या सिंचन योजना खेचून आणल्या आहेत. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाला आजतागायत मंत्रिपदाचा मान मिळाला नाही. कधी विरोधी पक्षाचा आमदार असल्याने संधी हुकली, तर कधी सत्ताधारी गटाच्या आमदाराचा मंत्रिपदासाठी विचारच झाला नाही. यावेळी मात्र डॉ. संजय कुटे यांच्या रूपाने सत्ताधारी भाजपा गटाचे हॅट्ट्रिक करणारे आमदार या मतदारसंघात असल्याने मंत्रिपदाचा लाल दिवा या मतदारसंघात येईल, अशी अपेक्षा या मतदारसंघातील जनता ठेवून आहे.