शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

दुष्काळ निकषात न नसलेल्या तालुक्यांचा मंडळनिहाय अहवाल सादर करा -  कृषी राज्यमंत्र्यांचे  निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:06 IST

बुलडाणा: दुष्काळाच्या ट्रिगर-१ आमि ट्रिगर-२ मध्ये नसलेल्या तालुक्यांचा मंडळनिहाय पाऊस, पीक कापणी प्रयोग आणि उत्पादकतेसंदर्भातील अहवाल आठवडा भरात राज्यशासनास सादर करण्याचे निर्देश कृषी व पाणी पुरवठा तथा स्वच्छता राज्यमंत्री सदाभऊ खोत यांनी बुलडाणा येथे दिले आहेत.

बुलडाणा: दुष्काळाच्या ट्रिगर-१ आमि ट्रिगर-२ मध्ये नसलेल्या तालुक्यांचा मंडळनिहाय पाऊस, पीक कापणी प्रयोग आणि उत्पादकतेसंदर्भातील अहवाल आठवडा भरात राज्यशासनास सादर करण्याचे निर्देश कृषी व पाणी पुरवठा तथा स्वच्छता राज्यमंत्री सदाभऊ खोत यांनी बुलडाणा येथे दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही टंचाई आढावा बैठक शनिवारी घेण्यात आली. बुलडाणा जिल्हयातील नांदुरा, खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर हे तालुके ट्रिगर-१ मध्ये असून ट्रिगर टू मध्ये लोणार, मलकापूर, सिंदखेड राजा, मोताळा तालुक्यांचा समावेश आहे. मात्र जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यातही बिकट स्थिती असल्याची ओरड आहे. त्या पृष्ठभूमीवर या निकषात न बसलेल्या तालुक्यांचा मंडळ निहाय पाऊ, पीक कापणी अहवाल आणि उत्पादकतेचा अहवाल कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे राज्यशासनास सादर करण्याबाबत कृषी राज्यमंत्र्यांनी निर्देशीत केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ९४ मंडळापैकी अवघ्या दोन मंडळामध्येच १०० टक्के पाऊस पडलेला आहे. १३ मंडळामध्येतर अवघा २५ टक्के पाऊस झाला असून ५० मंडळामध्ये ५० ते ७५ मिमीच पाऊस पडला आहे तर २९ मंडळामध्ये ७५ टक्के पाऊस झाला आहे. एकंदरीत विदारक स्थिती पाहता व होणारी ओरड पाहता अनुषंगीक विषयान्वये येत्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने हा अहवाल सादर करावा, असे ते म्हणाले. पाण्याची टंचाई पाहता उपलब्ध पाणीसाठे हे भविष्यासाठी राखीव ठेवण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेने करावेत, असे ही त्यांनी स्पष्ट केले. चारा टंचाईच्या दृष्टीनेही पशुसंवर्धन, महसूल व कृषि विभागाने आपल्या गावस्तरावरील यंत्रणेमार्फत गावातील चारा उपलब्धतेच्या माहिती आधारे अहवाल सादर करावा. त्यामध्ये ज्वारी, मका व ऊस पिकापासून मिळणार्या चार्याचे प्रमाण लक्षातघेऊन त्याप्रमाणे नियोजन करावे, असे ही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १७ पेयजल योजना सुरू आहेत. या योजना लवकरता लवकर पूर्ण करण्यात येऊन पाण्याच्या उद्भवापासून अंतर्गत जोडण्या करताना जलवाहिनीवर स्टॅन्डपोस्ट लावल्यास टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी लवकर मिळले, नादुरुस्त रोहीत्रांचीही दुरुस्ती करून अशा रोहीत्रांचा साठा अवश्यकतेनुसार करून ठेवावा, असे ही टंचाई आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्र्यांनी सुचीत केले. या बैठकीस खा. प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, आ. चैनसुख संचेती, राहूल बोंद्रे, डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सुपेकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते.

सात शहरात पाणीटंचाई भासणार

जिल्ह्यातील १३ शहरांपैकी सात शहरात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असून देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यात डिसेंबरमध्येच तर खामगाव, नांदुरा शहरात एप्रिलमध्येच तर मे महिन्यात लोणार, मलकापूर, मोताळा या शहरात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने प्रस्तावित उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत पालिका मुख्याधिकार्यांना बैठकीत सुचना देण्यात आल्या आहेत. नागरी भागातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यास दहा आॅक्टोबर रोजीच मान्यता देण्यात आली आहे.

तीन कोटींचे अनुदान प्रलंबीत

गेल्या वर्षीच्या टंचाई काळातील ग्रामीण भागातील उपाययोजनांसाठीचे दोन कोटी ९१ लाख तर नागरी भागातील उपाययोजनांसाठीचे सहा लाख रुपये असे एकूण दोन कोटी ९७ लाख रुपये अनुदान अद्यापही प्रलंबीत असून ते त्वरेने देण्याबाबतही हालचाली करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या ग्रामीण भागात दहा गावात नऊ टँकर्स सुरू असून ४७ गावात ५१ विहीरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. त्यावरून पुढील काळातील टंचाईच्या दाहकतेची कल्पना यावी. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSadabhau Khotसदाभाउ खोत droughtदुष्काळ