शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST

चिखली : आयटीआयचा पेपर सोडविण्यासाठी खामगाव येथे दुचाकीने गेलेल्या चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे आणि बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील दोन ...

चिखली : आयटीआयचा पेपर सोडविण्यासाठी खामगाव येथे दुचाकीने गेलेल्या चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे आणि बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील दोन विद्यार्थ्यांचे खामगावजवळील लोखंडा शिवारात धरण फाट्याजवळ अपघातात निधन झाले. खामगावकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने एका वाहनास ओव्हरटेक करताना या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला.

देऊळगाव घुबे येथील ऋषीकेश अरुण साखरे (वय २१) आणि शुभम नारायण काकडे (रा. रायपूर, ता. जि. बुलडाणा) हे दोन विद्यार्थी खामगाव येथील आयटीआय कॉलेजमध्ये १३ सप्टेंबरला आयटीआयचा पेपर सोडवण्यासाठी एमएच-२८-एक्स-८५३३ क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. पेपर सोडविल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दुचाकीने परतत असताना लोखंडा शिवारातील धरण फाट्याजवळ औरंगाबादहून खामगावकडे जाणाऱ्या एसटी बसचा (एमएच-२०-बीएल-१६९७) चालक एकनाथ शिवदास डोंगरे (३५, रा. औरंगाबाद) याने आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून खामगावकडे तोंड करून उभ्या असलेल्या व भुसा भरलेल्या एमएच-२८-एच-९८६० क्रमांकाच्या वाहनास धडक देत चालकाच्या बाजूने अेाव्हटेक करीत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीलादेखील जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील ऋषीकेश साखरे व शुभम काकडे या विद्यार्थ्यांचा जबर मार लागला. दरम्यान, विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेद्वारे डॉ. तकवीर अहमद प्राथमिक आरोग्य रुग्णालय, लाखनवाडा येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, याबाबतचे वृत्त कळताच दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातातील मृतक ऋषीकेश हा सुस्वभावी, मेहनती, निर्व्यसनी, नम्र असा मुलगा होता. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.