शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नुकसानग्रस्त भागात धान्य पुरवठ्याचे केले नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 2:02 PM

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनही नुकसानग्रस्त भागातील शेतकºयांसाठी धान्याचे वितरण करण्याचे नियोजन केलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अति पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागात अन्नधान्याचा तुटवडा पडू नये, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने योग्य ती तडजोड केलेली आहे. धान्य वितरणासाठी पुरवठा विभागाने पुर्वतयारी केली असून शासनाच्या सुचना आल्यास धान्याचे वितरण होऊ शकते.जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मि.मी. पाऊस पडतो. मात्र गेल्या दोन महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात अति पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मेहकर, देऊळगाव माळी, बिबी, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, शेंदुर्जन, सोनुशी, चांधई या आठ मंडळामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी हालेला शेतमाल हिरावल्या गेला. सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी या पिकांसह भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार या तालुक्यातील २१ गुरांवर अति पावसाने मृत्यूचे संकट ओढावले. तर जिल्ह्यातील ११ घरांची पडझड यामध्ये झालेली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची व्याप्ती बघता कृषी व महसूल विभागाकडून तातडीने सर्वे करण्याला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनही नुकसानग्रस्त भागातील शेतकºयांसाठी धान्याचे वितरण करण्याचे नियोजन केलेले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दिले जाणारे धान्य शेतकºयांना वेळेवर मिळावे, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. नुकसान झालेल्या भागात धान्याची टंचाई होणार नाही, यासाठी तहसीलस्तरावरून धान्याचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नुकसानग्रस्त भागातील सर्वांनाच मिळणार का लाभ?पावसाचा फटका शेतकºयांसोबत शेतमजुरांनाही बसला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार १७ शेतकºयांना गहू २ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो प्रमाणे वितरीत केल्या जातो. परंतू आता नुकसानग्रस्त भागातील सार्वांनाचा याचा लाभ मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकसानग्रस्त भागामध्ये धान्याचा तुटवडा पडू नाही, यासाठी योग्य ते नियोजन केलेले आहे. सर्वे दरम्यान कुठेही धान्याची आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी तातडीने धान्याची व्यवस्था होईल, याची काळजी घेतली आहे. तहसील स्तरावर आवश्यकतेनुसार धान्याचा साठा ठेवण्यात आलेला आहे.- गणेश बेल्लाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा