शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीची केवळ तीन टक्के पेरणी

By admin | Updated: October 16, 2015 01:57 IST

अल्पपावसाचा फटका ; १ लाख ५२ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन.

बुलडाणा : यंदा पावसाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हातातून गेला. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी पिकांवर नांगर फिरविला. यामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकर्‍यांची रब्बी हंगामाकडून आशा वाढली आहे; मात्र रब्बी हंगाम सुरू होऊन एक महिना लोटला तरी जिल्ह्यात सात तालुक्यात केवळ चार हजार हेक्टरवर तीन टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ७.४८ लाख हेक्टर आहे. यात १.५२ लाख हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे नियोजन कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने केले आहे. यंदा ९८ टक्के खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे; मात्र यंदा जिल्ह्यात पाण्याची कमतरता लक्षात घेता, गहू आणि मका या पिकांपेक्षा कमी पाण्यात येणार्‍या हरभरा पिकाची पेरावाढ होण्याची शक्यता आहे. यंदा सुरुवातीला अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, तर वेळेवर पाऊस न आल्यामुळे खरिपातील पिके शेतकर्‍यांच्या हातातून गेली. बर्‍याच तालुक्यात शेतकर्‍यांनी सुकलेल्या पिकांवर नांगर फिरविला, शिवाय आपले गुरे पिकांमध्ये सोडली. यामुळे खरिपाची पेरणी न झालेले आणि पीकबाधित झालेले असे एकूण ३६ हजार हेक्टर खरीप पेरणीक्षेत्र रब्बीकडे वळविण्यात आले. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघेल, या आशेवर शेतकरी रब्बीची पेरणी करीत आहे.