शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

रब्बीची केवळ तीन टक्के पेरणी

By admin | Updated: October 16, 2015 01:57 IST

अल्पपावसाचा फटका ; १ लाख ५२ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन.

बुलडाणा : यंदा पावसाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हातातून गेला. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी पिकांवर नांगर फिरविला. यामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकर्‍यांची रब्बी हंगामाकडून आशा वाढली आहे; मात्र रब्बी हंगाम सुरू होऊन एक महिना लोटला तरी जिल्ह्यात सात तालुक्यात केवळ चार हजार हेक्टरवर तीन टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ७.४८ लाख हेक्टर आहे. यात १.५२ लाख हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे नियोजन कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने केले आहे. यंदा ९८ टक्के खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे; मात्र यंदा जिल्ह्यात पाण्याची कमतरता लक्षात घेता, गहू आणि मका या पिकांपेक्षा कमी पाण्यात येणार्‍या हरभरा पिकाची पेरावाढ होण्याची शक्यता आहे. यंदा सुरुवातीला अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, तर वेळेवर पाऊस न आल्यामुळे खरिपातील पिके शेतकर्‍यांच्या हातातून गेली. बर्‍याच तालुक्यात शेतकर्‍यांनी सुकलेल्या पिकांवर नांगर फिरविला, शिवाय आपले गुरे पिकांमध्ये सोडली. यामुळे खरिपाची पेरणी न झालेले आणि पीकबाधित झालेले असे एकूण ३६ हजार हेक्टर खरीप पेरणीक्षेत्र रब्बीकडे वळविण्यात आले. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघेल, या आशेवर शेतकरी रब्बीची पेरणी करीत आहे.