शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आता १२ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:56 IST

बुलडाणा: इयत्ता दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या मार्फत घेण्यात येणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ५ नोव्हेंबर रोजी होणार होती; मात्र काही तांत्रिक अडचणी व दिवाळीच्या सुटीचा कालावधी विचारात घेता सदर परीक्षा ५ नोव्हेंबरऐवजी १२ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देतांत्रिक अडचणी, दिवाळी सुटीमुळे परीक्षा लांबणीवरशालेय क्षमता चाचणीवर भर!

ब्रम्हानंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: इयत्ता दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या मार्फत घेण्यात येणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ५ नोव्हेंबर रोजी होणार होती; मात्र काही तांत्रिक अडचणी व दिवाळीच्या सुटीचा कालावधी विचारात घेता सदर परीक्षा ५ नोव्हेंबरऐवजी १२ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.पर्यंत दर महिन्याला शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये अकरावी आणि बारावीसाठी १ हजार २५0 रुपये, पदवी तसेच पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिमहिना २ हजार रुपये आणि पीएच.डी.च्या चार वर्षांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. दहावीत शिकणारा किंवा सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणारा विद्यार्थी ज्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल, असे कोणीही ही परीक्षा देऊ शकतात. राज्यातील ३६६ विद्यार्थी राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी १३ सप्टेंबर ४ ऑक्टोबर ठेवण्यात आला होता; परंतु त्यात काही तांत्रिक अडचणीमुळे बदल करून २0 सप्टेंबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नियमित आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी ठेवण्यात आला. त्यामुळे ५ नोव्हेंबरला  होणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) पुढे ढकलण्यात आली आहे. ऑनलाइनच्या तांत्रिक अडचणी व दीपावली सुटीचा कालावधी विचारात घेता सदर परीक्षा आता १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. 

शालेय क्षमता चाचणीवर भर!राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा २00 गुणांची असून, त्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी, भाषा चाचणी (मराठी किंवा इंग्रजी) व शालेय क्षमता चाचणी अशा तीन विषयांचा समावेश आहे; मात्र बौद्धिक क्षमता व भाषा चाचणीपेक्षा  शालेय क्षमता चाचणी या  विषयावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यात बौद्धिक क्षमता चाचणीला ५0 गुण व ५0 प्रश्न आणि भाषा चाचणीलासुद्धा ५0 गुण व ५0 प्रश्न राहणार आहेत; मात्र या शालेय क्षमता चाचणी या विषयावर १00 गुण व १00 प्रश्न ठेवण्यात आले आहेत. 

पात्रतेसाठी ४0 टक्क्यांची आवश्यकताराज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील पात्रतेसाठी संवर्गनिहाय टक्केवारी ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये  बौद्धिक क्षमता चाचणी, भाषा चाचणी (मराठी किंवा इंग्रजी) व शालेय क्षमता चाचणी या प्रत्येक विषयांमध्ये पात्रतेसाठी जनरल संवर्गासाठी ४0 टक्के गुण व एस.सी., एस.टी आणि अपंग प्रवर्गासाठी ३२ टक्के गुण आवश्यक आहेत. यापेक्षा कमी गुण मिळविणारे विद्यार्थी अपात्र ठरविण्यात येणार आहेत. भाषा विषयाचे गुण पक्त उत्तीर्णतेसाठी विचारात घेतला जाणार आहेत. अंतिम निवड यादीमध्ये या गुणांचा विचार केला जाणार नाही. 

टॅग्स :Schoolशाळा