मोताळा (बुलडाणा) : भिलवाडा परिसरातील एका मुलीला गावातीलच तरूणाने लग्नाचे आमिष दा खवून पळवून नेले. ही घटना ८ मार्च रोजी उघडकीस आली. बोराखेडी (भिलवाडा) येथील मीरा अशोक बरडे यांनी ८ मार्च रोजी बोराखेडी पोस्टेमध्ये तक्रार दिली की, विजय राजू गायकवाड (वय २५) रा. येळगाव ह.मु. बोराखेडी याने फिर्यादीच्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास बोराखेडी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन ठाणेदार दीपक कोळी यांनी केले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}