शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भोगावती नदीवरील पुलासाठी चार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

साखरखेर्डा : परिसरात या वर्षी जाेरदार पाऊस हाेत आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येत आहेत. अनेक पूल ...

साखरखेर्डा : परिसरात या वर्षी जाेरदार पाऊस हाेत आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येत आहेत. अनेक पूल लहान असल्याने वाहतूक ठप्प हाेते. भोगावती नदीवरील पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असून, काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे .

चार वर्षांपासून साखरखेर्डा परिसरात आणि तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने, दरवर्षी ओल्या दुष्काळाचे सावट पसरले. कधी-कधी अतिवृष्टीमुळे पिके सडत आहेत. या वर्षीही १ जूनपासूनच पावसाला साखरखेर्डा मंडळात सुरुवात झाली. पाऊस पडला नाही, म्हणून पीक आले नाही, अशी वेळ आली नाही. अतिवृष्टीमुळे पिके, बियाणे खापली अशी ओरड झाली. ४५ दिवसांत दहा वेळा भोगावती नदी दुथडी भरून वाहली. कोराडी नदीही वाहली. सतत पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने, भोगावती नदीवरील क्षतिग्रस्त होत असलेला पूल नव्याने निर्माण करण्याची गरज झाली आहे. श्रीप्रल्हाद महाराज संस्थानचे विश्वस्त उल्हासराव देशपांडे यांनी भोगावती नदीवरील क्षतिग्रस्त झालेल्या पुलाची उंची वाढवून नव्याने बांधणी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व वाहातूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला हाेता. प्रल्हाद महाराज यांचे शिष्य नागपुरात मोठ्या प्रमाणात असल्याने उल्हास देशपांडे यांना त्यासाठी पाठपुरावा केला. भोगावती नदीवरील पुलाच्या पुनर्निर्माण कार्यासाठी ३ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले. पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

परिसरात मुसळधार पाऊस

साखरखेर्डा परिसरात गत काही वर्षांपासून मुसळधार पाऊस हाेत आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान हाेत आहे, तसेच नदी, नाले दुथळी भरून वाहत आहेत. अशातच अनेक पूल कमी उंचीचे असल्यामुळे त्यावरून पाणी वाहते. अनेक गावांचा संपर्क पुलावरून पाणी वाहत असल्याने तुटताे. त्यामुळे भाेगावती नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी हाेत हाेती. या पुलासाठी निधी मंजूर झाल्याने, आता काम तातडीने सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

काेट

या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर केला आहे.

उल्हासराव देशपांडे

ग्रामपंचायत सदस्य तथा विश्वस्त, प्रल्हाद महाराज संस्थान