लोकमत न्यूज नेटवर्कपळसखेड : शेत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी गावातील १५ ते २० शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा ३१ मे रोजी दुसरा दिवस होता. दरम्यान, वादळी पावसामुळे एक शेतकरी डोक्यात पाइप लागून जखमी झाला आहे. उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवले असून, अधिकारी जोपर्यंत शेतरस्ता मंजूर करत नाहीत. तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. या उपोषण मंडपाला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील तायडे, रसुलखान आदींनी भेटी देऊन चौकशी केली.पाडळी येथील शेतकऱ्यांची पाडळी, गिरडा व चौथा शिवारात शेती आहे. यापूर्वी शेतात जाण्यासाठी नदी पात्राचा वापर करण्यात येत होता. परंतु या नदीत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आल्यामुळे, तसेच नदीचे खोलीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा बैलगाडी नेण्यास अडचणी जात आहेत. या बाबत महसूल प्रशासनाकडे जाऊनही मार्ग निघेनासा झाला आहे. त्यामुळे ऐन यंदाचा खरीप हंगामावर शेतकऱ्यांना उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला आहे. कारण पेरणी करण्याकरता जाण्यास रस्ताच नसल्यामुळे शेतीची मशागत व पेरणी करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. तरी तातडीने शेत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी येथील शेतकरी समाधान डुकरे, प्रदीप डुकरे, अभिमन्यू डुकरे, श्याम पवार, सिद्धार्थ जाधव, अनिल डुकरे, गजानन डुकरे, प्रशांत पवार, रामेश्वर काळे, शालीग्राम जाधव, तानाजी डुकरे, शिवाजी डुकरे, रामदास मुळे, सुनील जाधव, संतोष जाधव, अशोक जुंबड व सुखदेव पवार या शेतकऱ्यांनी ३० मे पासून शेतात उपोषणास सुरुवात केली आहे.
उपोषण मंडपातील शेतकरी जखमी
By admin | Updated: June 1, 2017 00:12 IST
पळसखेड : गावातील १५ ते २० शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा ३१ मे रोजी दुसरा दिवस होता. दरम्यान, वादळी पावसामुळे एक शेतकरी डोक्यात पाइप लागून जखमी झाला आहे.
उपोषण मंडपातील शेतकरी जखमी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}