शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसानंतर झाली कालव्याची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST

पेनटाकळी शिवारात १६ डिसेंबर रोजी कालवा फुटल्याने गट नंबर ६५ मधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊन शेतमालाचे लाखो रुपयांचे नुकसान ...

पेनटाकळी शिवारात १६ डिसेंबर रोजी कालवा फुटल्याने गट नंबर ६५ मधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊन शेतमालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. हा कालवा याच ठिकाणी अगोदर दोन ते तीन वेळेस फुटला होता; मात्र त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. या कालव्यामध्ये अनेक झाडेझुडपे वाढत असल्याने या कालव्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कालव्याच्या खालच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकरिता शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभाग व महासंघाने सुद्धा वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा कालवा फुटला. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. हा कालवा दुरुस्त करण्याकरिता पाटबंधारे विभाग व बांधकाम विभागाचे कर्मचारी गेले असता, शेतकऱ्यांनी कालवा दुरुस्तीला विरोध केला होता; मात्र समन्वय साधत पाटबंधारे बांधकाम विभागाने कालव्याची दुरुस्ती केली. शनिवारी या कालव्याद्वारे पुढील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र परत हा कालवा फुटू नये, यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

रब्बी पिकांना फायदा

पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याचे सिंचन क्षेत्र ६८२ हेक्टर आहे. तर शाखा कालव्याचे सिंचन क्षेत्र ३ हजार ८९३ इतके आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका व ज्वारी पिकांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती पेनटाकळी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता चौगुले यांनी दिली.