शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : गारपिटीमुळे ३२ हजार ७00 हेक्टर क्षेत्र प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:29 IST

बुलडाणा : गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली असून, या पृष्ठभूमिवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अपर जिल्हाधिकारी दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानाची माहिती ४८ तासांच्या आत स्थानिक प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ४८ तासांच्या आत प्रशासनाला माहिती द्यावी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली असून, या पृष्ठभूमिवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अपर जिल्हाधिकारी दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानाची माहिती ४८ तासांच्या आत स्थानिक प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यातील ११ ही तालुक्यात रविवारी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये जिल्ह्यातील संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा, आंबा, कांदा, डाळिंब, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाले असून, जवळपास २७७ गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात गारपीटग्रस्तांच्या नुकसानाच्या पृष्ठभूमिवर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नुकसानाच्या पंचनाम्यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  सोमवारी बैठक बोलाविण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, कृषी उपसंचालक ढगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रभाकर श्रोते, कृषी विकास अधिकारी  मुकाडे व विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांनी झालेल्या नुकसानाबाबत ४८ तासांच्या आत स्थानिक प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन करीत अपर जिल्हाधिकारी म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी तत्काळ कृषी, महसूल विभाग, बँक व विमा कंपनीच्या 0११-३३२0८४८५ या टोल फ्री क्रमांकावर यापैकी एका ठिकाणी माहिती द्यावी. विमा कंपनीने तालुकास्तरीय प्रतिनिधींना नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई संबंधित शेतकर्‍याला तत्काळ अदा करावी. पीक विमा न काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे. हे पंचनामे पूर्ण होताच नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी केले.

चिखली तालुक्यात सर्वाधिक तर सिंदखेडराजा तालुक्यात सर्वात कमी नुकसान रविवारी झालेल्या गारपिटीमध्ये सर्वाधिक नुकसान हे चिखली तालुक्यात झाले असून, तालुक्यातील ५७ गावातील हरभरा, गहू, कांदा, भाजीपाला व फळपिकाचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७५९ हेक्टर क्षेत्र यामुळे प्रभावीत झाले आहे. खामगाव तालुक्यात ६६ गावात हरभरा, गहू, कांदा पिकाला फटका बसला असून, ८ हजार हेक्टरवरील रब्बी पिके नष्ट झाली आहेत. शेगाव तालुक्यात ३२९ हेक्टर, नांदुरा तालुक्यात ३00 हेक्टर, जळगाव जा.१३५, संग्रामपुरातील ६१ गावातील ६ हजार हेक्टर, मेहकरातील १ हजार ८७0, लोणारमधील १ हजार ८0, देऊळगावराजा तालुक्यात ६ गावातील १८९ हेक्टर आणि सिंदखेडराजामध्ये ११ गावात ३८ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. दुसरीकडे मोताळा आणि मलकापूर या दोन तालुक्यात तुरळक स्वरूपात पाऊस पडला असला, तरी प्रशासनाच्या आकडेवारीनुसार या तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नसल्याचे दिसून येत आहे. 

गारपीटमुळे ‘नेटशेड’चेही नुकसानदेऊळगावराजा तालुक्यात १८९ हेक्टर क्षेत्र प्रभावीत झाले असले तरी तालुक्यात जवळपास २७ नेटशेडला गारपिटीचा फटका बसलेला आहे. वरकरणी तालुक्यातील क्षेत्र कमी नुकसानग्रस्त वाटत असले तरी नेटशेडची संख्या पाहता येथील नुकसानीची रक्कम अधिक असल्याचे प्राथमिक स्तरावरील पाहणीत समोर येत आहे. 

११ तालुके  प्रभावितपश्‍चिम वर्‍हाडातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मलकापूर आणि मोताळा दोन तालुके वगळता जिल्हाभरात गारपीट व पावसामुळे रब्बीला फटका बसला आहे. बदललेल्या या हवामानामुळे आता वाचलेल्या पिकांना किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 

 जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पीक विमाधारक शेतकरी पंचनामे वा नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करावे.-प्रमोदसिंह दुबे, अपर जिल्हाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा