शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

बुलडाणा : गारपिटीमुळे ३२ हजार ७00 हेक्टर क्षेत्र प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:29 IST

बुलडाणा : गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली असून, या पृष्ठभूमिवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अपर जिल्हाधिकारी दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानाची माहिती ४८ तासांच्या आत स्थानिक प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ४८ तासांच्या आत प्रशासनाला माहिती द्यावी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली असून, या पृष्ठभूमिवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अपर जिल्हाधिकारी दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानाची माहिती ४८ तासांच्या आत स्थानिक प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यातील ११ ही तालुक्यात रविवारी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये जिल्ह्यातील संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा, आंबा, कांदा, डाळिंब, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाले असून, जवळपास २७७ गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात गारपीटग्रस्तांच्या नुकसानाच्या पृष्ठभूमिवर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नुकसानाच्या पंचनाम्यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  सोमवारी बैठक बोलाविण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, कृषी उपसंचालक ढगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रभाकर श्रोते, कृषी विकास अधिकारी  मुकाडे व विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांनी झालेल्या नुकसानाबाबत ४८ तासांच्या आत स्थानिक प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन करीत अपर जिल्हाधिकारी म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी तत्काळ कृषी, महसूल विभाग, बँक व विमा कंपनीच्या 0११-३३२0८४८५ या टोल फ्री क्रमांकावर यापैकी एका ठिकाणी माहिती द्यावी. विमा कंपनीने तालुकास्तरीय प्रतिनिधींना नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई संबंधित शेतकर्‍याला तत्काळ अदा करावी. पीक विमा न काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे. हे पंचनामे पूर्ण होताच नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी केले.

चिखली तालुक्यात सर्वाधिक तर सिंदखेडराजा तालुक्यात सर्वात कमी नुकसान रविवारी झालेल्या गारपिटीमध्ये सर्वाधिक नुकसान हे चिखली तालुक्यात झाले असून, तालुक्यातील ५७ गावातील हरभरा, गहू, कांदा, भाजीपाला व फळपिकाचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७५९ हेक्टर क्षेत्र यामुळे प्रभावीत झाले आहे. खामगाव तालुक्यात ६६ गावात हरभरा, गहू, कांदा पिकाला फटका बसला असून, ८ हजार हेक्टरवरील रब्बी पिके नष्ट झाली आहेत. शेगाव तालुक्यात ३२९ हेक्टर, नांदुरा तालुक्यात ३00 हेक्टर, जळगाव जा.१३५, संग्रामपुरातील ६१ गावातील ६ हजार हेक्टर, मेहकरातील १ हजार ८७0, लोणारमधील १ हजार ८0, देऊळगावराजा तालुक्यात ६ गावातील १८९ हेक्टर आणि सिंदखेडराजामध्ये ११ गावात ३८ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. दुसरीकडे मोताळा आणि मलकापूर या दोन तालुक्यात तुरळक स्वरूपात पाऊस पडला असला, तरी प्रशासनाच्या आकडेवारीनुसार या तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नसल्याचे दिसून येत आहे. 

गारपीटमुळे ‘नेटशेड’चेही नुकसानदेऊळगावराजा तालुक्यात १८९ हेक्टर क्षेत्र प्रभावीत झाले असले तरी तालुक्यात जवळपास २७ नेटशेडला गारपिटीचा फटका बसलेला आहे. वरकरणी तालुक्यातील क्षेत्र कमी नुकसानग्रस्त वाटत असले तरी नेटशेडची संख्या पाहता येथील नुकसानीची रक्कम अधिक असल्याचे प्राथमिक स्तरावरील पाहणीत समोर येत आहे. 

११ तालुके  प्रभावितपश्‍चिम वर्‍हाडातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मलकापूर आणि मोताळा दोन तालुके वगळता जिल्हाभरात गारपीट व पावसामुळे रब्बीला फटका बसला आहे. बदललेल्या या हवामानामुळे आता वाचलेल्या पिकांना किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 

 जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पीक विमाधारक शेतकरी पंचनामे वा नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करावे.-प्रमोदसिंह दुबे, अपर जिल्हाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा