शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

२00 हेक्टरवरील सोयाबीन वाळले

By admin | Updated: September 22, 2014 23:48 IST

सोयाबीनचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाळून गेले आहे.

लोणार : तालुक्यातील खळेगाव व अंजनी खुर्द शिवारातील २00 हेक्टरवरील सोयाबीनचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाळून गेले आहे. या नुकसानीची पाहणी करून मदतीच्या मागणीसाठी शेतकरी आपल्या शेतातील सुकलेली सोयाबीनची झाडे घेऊन चक्क तहसील कार्यालयावर धडकले. दरम्यान, या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याच्या मागणीचे निवेदनही तहसीलदारांना यावेळी दिले. गेल्या वर्षभरापासून शेतकर्‍यांवर अस्मानी संकट राहिले आहे. अतवृष्टीनंतर गारपीट आणि आता समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन पीक वाळून गेले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतीत उत्पन्न न झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे तसेच कीड व रोगांचा मारा यामुळे २00 हेक्टरवरील शेतातील सोयाबीनचे पीक करपून गेले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या शेतकर्‍यांनी नायब तहसीलदार मते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मनसेचे विनोद वाघ, शेतकरी बाबाराव मुंढे, बद्रीनाथ सानप, सुभाष सानप, भागवत वायाळ, सुधाकर वायाळ, संतोष वायाळ, माधव सानप, दिनेश कांगणे, रामदास आंधळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतातील सोयाबीनची सुकलेली झाडेच आणल्याने ते सर्वांचे आकर्षण ठरले.