शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

तिरोडा-कटंगी रेल्वे मार्गाचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 6:00 AM

इंग्रजांच्या काळात रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. तिरोडीपर्यंत रेल्वेचे कामही झाले. त्यानंतर उत्तर भारताशी जोडणाऱ्या कटंगी मार्गाची मागणी पुढे येवू लागली. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. १३ जून २०११ तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री कमलनाथ यांच्या हस्ते या मार्गाचा शिलान्यास करण्यात आला. त्यानंतर काम पुन्हा रखडले.

ठळक मुद्देसात दशकांपासून मागणी : उत्तर भारतात जाणारा जवळचा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तिरोडी ते कटंगी या रेल्वे मार्गाचे बांधकाम गत सात दशकांपासून अपूर्ण आहे. केवळ १५.९ किमीचा ट्रॅक पूर्णत्वास आला तर उत्तर भारतात जाण्यासाठी जवळचा आणि सोईचा मार्ग ठरणार आहे. गत दोन वर्षांपासून सुरु असलेले काम अतिशय संथगतीने सुरु आहे.इंग्रजांच्या काळात रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. तिरोडीपर्यंत रेल्वेचे कामही झाले. त्यानंतर उत्तर भारताशी जोडणाऱ्या कटंगी मार्गाची मागणी पुढे येवू लागली. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. १३ जून २०११ तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री कमलनाथ यांच्या हस्ते या मार्गाचा शिलान्यास करण्यात आला. त्यानंतर काम पुन्हा रखडले. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी रेल्वे ट्रॅकच्या बांधकामाचे पुन्हा भूमिपुजन खासदार बोधसिंग भगत यांच्याहस्ते करण्यात आले. दोन वर्षात हा रेल्वे मार्ग पुर्ण होईल असे सांगण्यात आले. परंतु बांधकामाची गती संत असल्याने २०२० पर्यंत काम पूर्ण होण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाही.तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाचे अंतर १५.९ किमी आहे. यासाठी १८६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ६९.३८ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. या मार्गावर सहा मोठे पुल, २४ लहान पुल, १३ रस्त्यावरील पुल बांधण्यात येणार आहे. पोनिया या रल्वे स्थानकावर नव्याने बांधकाम केले जाणार आहे.नागपूर-कटंगी-जबलपूर मार्गतिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे बांधकाम पुर्ण झाल्यावर नागपूर - कटंगी - जबलपूर असा रेल्वे मार्ग निर्माण होणार आहे. त्यामुळे उत्तर व दक्षिण भारतात जाणाºया प्रमुख रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे. कटंगी- बालाघाट- जबलपूर हा रेल्वे पुर्वीपासून अस्तित्वात आहे. केवळ तिरोडी-कटंगी रेल्वेचे काम तेवढे रखडले आहे. तुमसर रोड ते तिरोडीचे अंतर ४६.८३ किमी आहे. यात सात रेल्वेस्थानक आहे. याकरिता रेल्वेगाडीला एक तास २० मिनिटे लागतात. नवीन रेल्वेमार्गामुळे मध्यप्रदेशासोबत व्यापार, शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे