शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या लोंबीने उन्हाळी धानाचे उत्पन्न घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

लाखनी तालुक्यात सुमारे १९८२ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आलेली आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे ९८१ हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीखाली आलेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उन्हाळी धानाचे क्षेत्रफळ थोडे वाढलेले आहे. खरीपात वरूण राजाने प्रसन्नता दाखवित नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली होती. त्यामुळे भूजल साठ्यात एक ते दीड मीटरने वाढ झालेली जाणवली.

ठळक मुद्देलाखनी तालुका: चारदा फवारणी करूनही नियंत्रण नाही, खरिपाच्या खरेदीने गोडाऊन फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान कापणीला सुरुवात होत आहे. दरवर्षीच्या उन्हाळी धानाचा स्थिती पाहता यावर्षी पांढºया लोंबीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने धानाचे उत्पन्न अर्ध्यावर येण्याची शक्यता वाढली आहे.
लाखनी तालुक्यात सुमारे १९८२ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आलेली आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे ९८१ हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीखाली आलेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उन्हाळी धानाचे क्षेत्रफळ थोडे वाढलेले आहे. खरीपात वरूण राजाने प्रसन्नता दाखवित नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली होती. त्यामुळे भूजल साठ्यात एक ते दीड मीटरने वाढ झालेली जाणवली. याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी उन्हाळी धानात व भाजीपाला क्षेत्रात लागवड वाढवली आहे. १५ एप्रिलपर्यत वरुण राजाने अवकाळीच्या रूपाने हजेरी लावल्याने उन्हाळी धानाला पाणीटंचाई जाणवली नाही. भूजल जरी त्रासदायक ठरला नसला तरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण नियमित असल्याने खोडकिडीचा, पर्णकोष करपाचा त्रास अधिक झाल्याने आता निसव्यावरील पांढºया लोंबीचे प्रमाण सर्वाधिक जाणवत असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. सुरुवातीपासून रोग व किडीचा अभ्यास घेत कृषी विभाग व भात पैदाकार यांच्या सल्ल्यानुसार शेतकºयांनी अनेकदा फवारणी करण्यात आली. मात्र नियमित, अवकाळी व ढगाळ वातावरण असल्याने रोग व कीडीला पोषक वातावरण तयार झाल्याने पांढºया लोंबीचे प्रमाणात वाढ झाल्याचे अभ्यासकांकडून वर्तविण्यात आले आहे.
शेतकºयांनी नियमित बांधानात उतरून कीडीचा व रोगाचा अभ्यास ठेवावा. वेळेत रोगाचे व किडीचे निदान झाल्यास त्यावर फवारणी निश्चितपणे केल्यास होणारे नुकसान टाळता येते. एका एकराला १८० ते २०० लीटर द्रावण फवारणी अत्यावश्यक आहे. बरेच शेतकरी अपेक्षित असलेला द्रावण फवारणी करीत नसल्याने किडीचा प्रादूर्भाव वाढत जावून पिकाचे नुकसान होते.

कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारसीनुसार फवारणी करणे अत्यावश्यक आहे.
-गणपती पांडेगावकर,
मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.

टॅग्स :agricultureशेती