शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे, पाणीटंचाईसाठी तातडीने उपाययोजना करा

By admin | Updated: July 12, 2014 00:53 IST

संपूर्ण राज्यातील जनतेला पावसाची प्रतिक्षा लागलेली आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते.

भंडारा : संपूर्ण राज्यातील जनतेला पावसाची प्रतिक्षा लागलेली आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. ही संभाव्य शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारी बियाणे, पाणी टंचाईसाठी उपाययोजना आणि जनावरांसाठी चारा याचे नियोजन करावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिलेत.
जिल्ह्यातील पाऊस, पेरणी, पिकांची स्थिती आणि टंचाई यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला. यावेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड उपस्थित होते.
यावेळी ना. देशमुख यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुदळे यांचेकडून जिल्ह्यातील पीक परिस्थितीची माहिती घेतली. जिल्ह्यात २ लाख हेक्टर एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी २७.८४२ हेक्टरवर धान, तुर, ऊस, सोयाबिनची पेरणी झाली आहे. १ लाख ८१ हजार ५९१ हेक्टर क्षेत्र धान पिकाखाली आहे. १६ हजार २८० हेक्टरवर पऱ्हे लागवड झाली असून केवळ ७१८ हेक्टरवर म्हणजे ०.४१ टक्के टक्के रोवणी झाली आहे. एकूण पऱ्हेखालील क्षेत्रापैकी ५० टक्के पऱ्हे करपले आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे, अशी माहिती कुदळे यांनी दिली.
दुबार पऱ्हे लागवडीसाठी २० हजार ५०० क्विंटल धान बियाण्यांची मागणी लक्षात घेऊन कृषी विभागाने बियाण्यांची उपलब्धता करावी. तसेच कमी कालावधीत येणाऱ्या धानाच्या जातीचे यावर्षी उत्पादन घेण्याविषयी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कमी पावसाची शक्यता लक्षात घेता भविष्यात कोणत्या गावात पाणीटंचाई निर्माण होवू शकते याचा आढावा घ्यावा. ग्रामसेवक, सरपंच, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांची बैठक घेऊन पाणीटंचाई निवारण्यासाठी कामांची आवश्यकता असेल तिथे पाणीटंचाई आराखडा भाग-३ मध्ये कामे मंजूर करावीत. त्याचप्रमाणे जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करा, असे त्यांनी सांगितले.
पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करावी. बँकेच्या प्रमुखांची यासंदर्भात बैठक घेऊन त्याचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाव वगळणे, समाविष्ट करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. तहसीलदारांनी योग्य लाभार्थ्यांची शहनिशा करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी तहसीलदारांना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)