शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याच्या प्रकोपाने शेतातील पिके करपली

By admin | Updated: May 21, 2017 00:17 IST

बळीराजा... भर उन्हात कशाचीही तमा न बाळगता शेतात दिवसरात्र राबराब राबतो. खरिपाच्या पूर्वतयारीची शेतकरी लगबग करीत असला तरी,

पारा ४६ अंशाच्या घरात : जनजीवन प्रभावित, पिकांची मान टाकली, भाजीपाल्यांवर अळींचा प्रादुर्भावमुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : बळीराजा... भर उन्हात कशाचीही तमा न बाळगता शेतात दिवसरात्र राबराब राबतो. खरिपाच्या पूर्वतयारीची शेतकरी लगबग करीत असला तरी, त्यांच्यासमोर आता शेतातील धानपिक व भाजीपाला धार्जिनीचे पीक वाचविण्याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. उन्हाची प्रखरता व विद्युत भारनियमण या दोन्हीच्या कचाट्यात शेतकऱ्यांची शेती व भाजीपाला अडकला असून त्यांच्या आर्थिक संकट घोंगावत आहे.नदीकाळावरील व बारमाई भरपूर पाण्याच्या विहिरी, बोअरवेल्स, फिल्टरपंप आटल्याने पिकांनी मान खाली टाकली आहे. शेतकरी सुमार अडचणीत आला आहे. भाजीपाल्यात अतिउष्णतेने अळी, बुरशीने जोर धरला असून उत्पादनाची पुरी ऐशीतैशी झाली आहे. शेतात विहिर आहे, पण त्यात पाणी नाही. तर ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही. असा दुहेरी मारा त्यातल्या त्यात भारनियमण व उष्णतेचा परिपात यामुळे शेतकऱ्यांना पिकांबाबत विचार करूनच घामाघुम होतानाची परिस्थिती सध्याची आहे.अगदी सकाळपासूनचं उष्णतेचा कळस गाठत आहे. त्यामुळे भाजीपाला धार्जिनी पिकांसापासून कसेबसे आर्थिक उत्पन्न घेता येईल, असा विचार करून शेताता भाजीपाला पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे गणित पुरते कोलमडले आहे. त्यामुळे सावकारी कर्ज, बँक व सोसायटी कर्ज व त्यांनतर बचत गटातून घेतलेले हातऊसणवारी याच्या व्याजाच्या चक्रव्यूव्हात आता शेतकरी सापडला आहे. जलस्त्रोत पुरता कोरडा पडल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने घामांसह डोळ्यातून आसवेही गाळावे लागत आहे. अशा परिस्थितीतून कसाबसा वाचविलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात नेल्यावर कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. निसर्गचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना वाचविण्यासाठी प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे.मे हिटने प्रभाव तेज केल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस सुर्य अधिकच तापत असल्याने भविष्याची चिंता वाढली आहे. पाण्याची पातळी अगदी खोल गेली असून पिकांनीसुद्धा मान टाकली आहे. विजेच्या कमी दाबाच्या पुरवठ्याने कुलर, पंखे, फिरतच नसल्याने उन्हाळा असह्य वाटत आहे.चुलबंध नदीकाठावरील लोहारा, पाथरी, मऱ्हेगाव, वाकला, सारख्या गावात पाण्याची टंचाई असणे म्हणजे गावातील अनेक आश्चर्यापैकी एक. तप्त उन्हात, खुल्या आभाळात अचानक वादळवाऱ्यासह पावसाची हजेरी लागत थोड्याफार उष्माकमी होण्याची आस नागरिकांना लागली आहे. शेतकरी मात्र उन्हातान्हाची परवा न करता अंगावरील कमी कपड्यात घामाच्या धारासह खरीब हंगामात व्यस्त दिसत आहे. सध्या हातातील पीक वाचविण्यासाठी बळीराजा पराकोटीचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांना निसर्गाची साथ लाभत नसल्याचे दिसून येत आहे.