शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा उंबरठा न ओलांडताच विद्यार्थी पोहोचले दुसरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:33 IST

शासनाच्या धोरणानुसार, विद्यार्थी दुसरीमध्ये जाऊनही त्या विद्यार्थ्याला प्रथम ज्या शिक्षणाची गरज आहे त्या अ,ब,क,ड अक्षरांच्या ओळखीपासून विद्यार्थी दूर गेला ...

शासनाच्या धोरणानुसार, विद्यार्थी दुसरीमध्ये जाऊनही त्या विद्यार्थ्याला प्रथम ज्या शिक्षणाची गरज आहे त्या अ,ब,क,ड अक्षरांच्या ओळखीपासून विद्यार्थी दूर गेला आहे. त्यामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद करून त्याऐवजी ऑनलाइन शिक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे; मात्र या शिक्षण प्रणालीचा आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात काहीच उपयोग होत नाही.

कारण या भागात गरीब व शेतमजूर मोठ्या प्रमाणात आहेत. ही मंडळी सतत कामाच्या शोधात भटकंती करीत असतात. त्यांची मुले खेळण्यात व्यस्त असतात. कोणत्याही कुटुंबाकडे स्मार्टफोन असेल तर त्यांच्याकडे फोनला कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण प्रणालीपासून विद्यार्थी अलिप्त राहिले आहेत.

मागील वर्षीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेचे तोंड बघितले नसताना दुसऱ्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शैक्षणिक विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.