शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त कंत्राटदारांनी केले काम बंद!

By admin | Updated: June 14, 2016 00:17 IST

जिल्हा परिषद अखत्यारितील लघु पाटबंधारे विभागाच्या कामावरील मजूरांचा विमा काढा अन्यथा देयकांना विसरा.

प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : जिल्हाधिकारी, कार्यकारी अधिकारी यांना दिले पत्रप्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषद अखत्यारितील लघु पाटबंधारे विभागाच्या कामावरील मजूरांचा विमा काढा अन्यथा देयकांना विसरा. असा निर्वाणीचा इशारा कार्यकारी अभियंता यांनी दिल्याचे पत्र भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराना बजावले होते. यामुळे कंत्राटदारांनी सदर काम बंद करण्याचे पत्रच जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना देवून आपला संताप व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात मामा तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, बाजार तलावाचे काम व जलयुक्त शिवार योजनेतील वेगवेगळी कामे सुरु आहेत. या कामावरील मजुरांचा विमा काढावा व त्यांच्या नोंदणीकृत नंबर कार्यालयात सादर करावा अन्यथा कामाचे देयक मिळणार नाही, अशा इशारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिला होता. निर्देशानुसार भंडारा उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार व एजन्सीला मागील आठवड्यात पत्र बजावले आहे. सदर पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले. या पत्रांमुळे काम करणाऱ्या ठेकेदारांमध्ये असंतोष पसरला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भोर यांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दिलेल्या या आदेशामुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे पूर्ण होण्याबाबत शंका निर्माण होण्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या पत्रामुळे भंडारा उपविभागात सुरु असलेल्या तलावांचे काम करणाऱ्या कंत्राटदारामध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, यातील काही कंत्राटदारानी कार्यकारी अभियत्यांच्या निर्देशाला कंटाळून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता पराते व उपविभागीय अभियंता यांना काम बंद करत असल्याचे पत्र देवून आपला संताप व्यक्त केला आहे. कंत्राटदारानी दिलेल्या या पत्रांमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासकीय अधिकारी व कत्राटदारांमध्ये कामावरुन अशी धुसफूस सुरु झाल्याने आता काम बंद पडल्याच्या मार्गावर आहे. यावर प्रशासक काय तोडगा काढते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.कंत्राटदारांच्या पत्रातील मजकूरकंत्राटदारांनी पत्रात, त्यांची कामे ग्रामीण भागात आहेत. त्यांचे काम लहान स्वरूपाचे असल्यामुळे सदर कामावर निवासी (कॅम्प मजूर) लावणे शक्य नाही. कामावरील मजूर हे कामाच्या स्वरूपानुसार दोन तीन दिवसात बदलतात. कामापूर्वी अटी करारनामा करताना कंत्राटदारांना अशी अट सांगण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार देयक मिळणार नसल्याने काम बंद करण्यात येत आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचे मोजमाप करून त्याचे पैसे देण्यात यावे व विहीत मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर त्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार नाही.