शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्पाचा लघु कालवा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST

भंडारा : सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहत बावनथडी नदीवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभारण्यात आला. कालवेही तयार करण्यात आले. ...

भंडारा : सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहत बावनथडी नदीवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभारण्यात आला. कालवेही तयार करण्यात आले. मात्र, या प्रकल्पाचा लघु कालवा क्रमांक २ अद्यापही कोरडाच आहे. खमाटा ते टाकळीजवळ कालवा अपूर्ण असल्याने सिंचन अशक्य झाले आहे. या प्रकल्पाचे पाणी सोडून शेतकऱ्यांना सुविधा द्यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा अन्यायग्रस्त शेतकरी समितीने केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यावर आंतराज्यीय बावनथडी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर तुमसर आणि मोहाडी तालुक्यात सिंचन केले जाते. तुमसर तालुक्यांतर्गत बावनथडी प्रकल्प लघु कालवा क्रमांक २ ला दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने मंजुरी दिली. बावनथडी प्रकल्पापासून ६० कि.मी. अंतरापर्यंत खमाटा गावापर्यंत कालव्याचे काम पूर्ण झाले आहे; परंतु तेथून टाकळीपर्यंत सुमारे १ किलोमीटर बांधकामच पूर्ण झाले नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले; परंतु अद्यापही कोणतीच कारवाई झाली नाही.

खमाटा (टाकळी) येथील शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. उपजीविकेसाठी शेतीशिवाय पर्याय नाही. यावर्षी वैनगंगा आणि सूर नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही नुकसानभरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड केली. या धानाला आता पाण्याची गरज आहे; परंतु कालव्याचे काम अपूर्ण असल्याने खमाटा येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. बावनथडी प्रकल्प लघु कालवा क्रमांक २ चे बांधकाम पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

अन्यायग्रस्त शेतकरी समितीचे निवेदन

भंडारा जिल्हा अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, अशोक पवनकर, पुरुषोत्तम गायधने, विकास निंबार्ते, विकास मेश्राम, कोठीराम पवनकार आदी उपस्थित होते.