शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळचा निधी सहा महिन्यांपासून रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:35 IST

शासनाने निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना व अर्थसाहाय्य अशा योजना सुरू केल्या ...

शासनाने निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना व अर्थसाहाय्य अशा योजना सुरू केल्या आहेत. श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. मागील सहा महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. कुटुंब प्रमुखाच्या मृत्यू झाला असल्यास वीस हजारांचे अर्थसाहाय्य शासनाकडून दिले जाते. हा निधीही वेळेवर येत नसल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे. दर महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होत नाही, अनेक लाभार्थी तहसील कार्यालयाच्या चकरा मारतात. शासनाकडून निधी आला नाही असे त्यांना सांगण्यात येते. आल्या पावली त्यांना निराश होऊन जावे लागते. दर महिन्याला नियमितपणे निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना निधी देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.

तुटपुंजा निधी शासन देत असल्याने नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असल्याचे माजी सभापती कलाम शेख यांनी सांगितले.

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांचा श्रावणबाळ योजनेचा निधी शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात निधी वळते करण्यात आले नाही. निधी आल्यानंतर त्यांच्या खात्यात निधी वळते करण्यात येईल.

अशोक पाटील, नायब तहसीलदार, तुमसर