शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

वरठीत सुरक्षेचा भार असुरक्षित पोलिसावर

By admin | Updated: February 26, 2015 00:31 IST

मोहाडी तालुक्यात वरठी हे गाव अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. वरठी येथे १९७२ ला भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी सुरु करण्यात आली.

तथागत मेश्राम वरठी मोहाडी तालुक्यात वरठी हे गाव अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. वरठी येथे १९७२ ला भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी सुरु करण्यात आली. त्यावेळी १ पोलीस हवालदार व २ सहाय्यक हवालदाराची नियुक्ती करण्यात आली होती. ५० वर्षानंतरही कर्मचाऱ्याची संख्या तेवढीच आहे. दरम्यान या चौकी अंतर्गत येणाऱ्या गावाचे क्षेत्र व लोकसंख्येत दहापटीने वाढले. त्याबरोबर गुन्ह्यात वाढ झाली. गावात रेल्वे स्टेशन असल्यामुळे चोरी, लुटमार, गुन्हे, अवैध व्यवसाय, वाहतूक अव्यवस्था या सारख्या घटना वाढल्या. पण पोलीस चौकीत सुधारणा झाली नाही. सुरक्षेचा प्रश्न उद्वभवल्यास आजही भंडारा येथून येणाऱ्या कर्मचाऱ्याची वाट पहावी लागते. सुरक्षा कर्मचारी कमी असली तरी परिस्थिती हाताळणारी माणसे असल्यामुळे गावात अनुचीत घटना घडत नाही. पण चोरी, लुटपाट, अवैध व्यवसाय व वाहतूक यासारख्या घटना घडतातच. १२ गाव, तीन कर्मचारी : वरठी चौकी अंतर्गत १२ गावे येतात. यात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्यातील गावांचा समावेश असून लगतच्या नागपूर व गोंदिया जिल्ह्याच्या सिमा पर्यंतचा भाग या चौकी अंतर्गत येतात. मोहाडी तालुक्यातील वरठी सह, एकलारी, बीड, सातोना, पाहुणा, नेरी, खमारी व भंडारा तालुक्यातील सोनुली, सिरसी, जमनी - दाभा, व पाढंराबोडी या गावाचा समावेश आहे. वरठी चौकीच्या अंतर्गत येणाऱ्या दोन टोकाच्या गावातील अंतर ३४ किमी आहे.भाड्याच्या घरात : १९७२ पासून सदर पोलीस चौकी भाड्याच्या घरात आहे. बाजारातील एका इमारतीत ही चौकी आहे. तिन खोल्याच्या या घरात असुविधांचा बोलबाला असून कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था नाही. सदर घर असुरक्षीत असून वेळप्रंसगी आरोपी ठेवण्यालायक जागा उपलब्ध नाही. समोरच्या खोलीत कार्यालयाची व्यवस्था आहे. दोन नंबरच्या खोलीत आराम करण्यासाठी पंलग व दस्तावेज ठेवले आहेत. तिसऱ्या खोलीत स्वंयपाकघर असून रात्रपाळीत कार्यरत कर्मचाऱ्यांना थांबण्यासाठी वापर होतो.वाहन व्यवस्था नाही : वरठी पोलीस चौकी अंतर्गत ३४ किमीचे अंतराचे कार्यक्षेत्र आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चौकीत एकही चार चाकी वाहन नाही. पोलीस स्टेशनचे फोन खणखणाताच येथे कार्यरत कर्मचारी स्वत:च्या दुचाकीने पळत सुटतात. एखादी मोठी घटना घडल्यास किंवा दंगा झाल्यास त्यावर अंकुश लावण्यासाठी किंवा घटनास्थळावर जाण्यासाठी त्यांना भंडारा येथून येणाऱ्या वाहनाची प्रतिक्षा करावी लागते.पोलिस कर्मचारी नाममात्र येथे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह तीन हवालदार अस्थायी नियुक्त आहेत. यापैकी एक कर्मचारी साप्ताहिक सुटीवर असल्यास तिनच कर्मचारी राहतात. १२ गावाची सुरक्षा व त्यासाठी असलेली व्यवस्था तोकडी आहे. त्यातल्या त्यात येथील कर्मचारी भंडारा येथे ड्युटी लावण्यात येते. कोणताही गुन्हा घडला की भंडारा येथे नोंद करण्यासाठी जावे लागते, म्हणून बहुतेक वेळा चौकी कुलुपबंद राहते.गस्तीची गरजगावात रेल्वे स्टेशन व सनफ्लॅग कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिवस - रात्र प्रवाशांची रेलचेल राहते. रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था नाही. सदर परिसर यांच्या हद्दीत येते. रेल्वे स्टेशन असल्यामुळे गावात चोरांना सोयीचे होते. यामुळे येथे नियमित गस्त वाढवण्याची गरज आहे. याकरिता पोलिस वाहन व अतिरिक्त कर्मचारीची आवश्यकता आहे.असुरक्षित पोलीस : सध्याच्या युगात चोर - डाकू अद्यावत शस्त्र बाळगत असताना लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस निशस्त्र फिरतात. हातात काठी घेवून शस्त्रधारी गुंडाना किंवा गर्दीला कसे पांगवायचे असा प्रश्न त्यांना पडतो. यामुळे अनेकदा त्यांना पळ काढावा लागतो. एंकदरीत वरठी येथे नियुक्त पोलीस कर्मचारी असुरक्षित आहेत.पोलीस ठाण्याचा प्रस्ताव गायबस्व. आर. आर. पाटील यांनी ५ वर्षापुर्वी वरठी येथे पोलीस ठाणे मंजुर केला होता. दरम्यान अनेकदा मागणी झाली. पण सदर प्रस्ताव व मंजुरी गायब झाल्यासारखे दिसते.लोकसहभागावर भरपोलीस कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या व गैरसमज यातून निर्माण होणारे क्षुल्लक वाद यावर लोकसहभागातून तोडगा काढण्याचा स्तुत्य उपक्रम या चौकीत सुरु आहे. गुन्ह्याची वास्तवता शोधून त्यातील गंभीरता पाहून गुन्ह्याची नोंद होते. आपसी विवाह व गैरसमज दुर करण्याकरिता गावातील पंचाचा आधार घेतला जातो. गावातील गुन्हे गावातच सोडवण्यात यावे, म्हणून विशेष काळजी घेतली जाते. लोकसहभागातून वाद मिटवण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे.