शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर-भंडारा येथे रिवा इतवारी प्रवासी गाडीचा थांबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

तुमसर: रिवा-इतवारी-रिवा ही प्रवासी गाडी २४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. परंतु तुमसर, भंडारा येथे थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशात ...

तुमसर: रिवा-इतवारी-रिवा ही प्रवासी गाडी २४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. परंतु तुमसर, भंडारा येथे थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशात असंतोष आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या येण्याची वेळ ही बदलल्याने सायंकाळी नागपूरवरून परत येण्यास ही गाडी सोयीची ठरणार आहे. बालाघाट येथे लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे पाच मिनिटाचा थांबा देण्यात आला. असाच दबाव येथे निर्माण करण्याची गरज आहे.

रविवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ४.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा एनोग्रेशन रन या गाडीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. प्रत्यक्षात २४ फेब्रुवारीपासून ही गाडी सुरू होत आहे. रिवा येथून ती सायंकाळी ५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी इतवारीला ०७.२५ ला पोहोचणार आहे. आठवड्यातून ही गाडी तीन दिवस राहणार असून, रिवा येथून सोमवार, बुधवार, शनिवारला सुटणार आहे. २५ फेब्रुवारीला इतवारीवरून रिवाकरिता ही गाडी धावणार आहे. इतवारीवरून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व रविवारला ही गाडी सोडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदल :

महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाडीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही गाडी नागपूर वरून ५ वाजता सुटायची. ती आता दुपारी ३.३० वाजता सुटत आहे. त्यामुळे दिवसभर नागपूर येथून काम केल्यानंतर सायंकाळची गाडी नाही. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही दुपारीच स्वतः असल्याने अनेकांना आता अडचण निर्माण झाली आहे. रिवा-इतवारी एक्स्प्रेस गाडी सायंकाळी ६ वाजता सुटत असल्याने किमान प्रवाशांना तीन दिवस येथे सोयीचे होणार आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

नागपूर विभागात भंडारा व तुमसर हे मोठे जंक्शन आहेत. येथून रेल्वेला महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. प्रवाशांची ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने रिवा इतवारी एक्स्प्रेस गाडीचा थांबा भंडारा व तुमसर येथे दिला नाही. भंडारा जिल्ह्याचे स्थान आहे, याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना संक्रमण काळात प्रवासी गाड्यांची संख्या कमी आहे तसेच एक्स्प्रेस गाड्यात तिकीट आरक्षण करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे मोठ्या रेल्वेस्थानकावर किमान एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची गरज आहे.