शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

किन्ही-गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 6:00 AM

किन्ही गडेगाव येथील तलावाची अवस्था दयनीय झाली होती. त्यात जलसंचय होण्यास अडचण होत होती. सदर तलाव सुमारे ५३ हेक्टर परिसरात आहे. हा प्रकार हिंदूजा फाउंडेशनच्या निदर्शनास आला. त्यांनी या तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी निधीतून तीन महिन्यापूर्वी तलावाच्या पुनरूज्जीवन कामाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देवन्यजीवांसह चार हजार लोकसंख्येला होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील बहुतांश तलावांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा तलावांचे सामाजिक बांधिलकीतून पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदूजा फाउंडेशनच्या पुढाकारातून भंडारा तालुक्यातील किन्ही गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन करण्यात आले. या तलावात पाण्याचा मोठा साठा झाला असून याचा फायदा वन्यजीवांसह परिसरातील चार हजार लोकसंख्येला होणार आहे.किन्ही गडेगाव येथील तलावाची अवस्था दयनीय झाली होती. त्यात जलसंचय होण्यास अडचण होत होती. सदर तलाव सुमारे ५३ हेक्टर परिसरात आहे. हा प्रकार हिंदूजा फाउंडेशनच्या निदर्शनास आला. त्यांनी या तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक बांधिलकी निधीतून तीन महिन्यापूर्वी तलावाच्या पुनरूज्जीवन कामाला सुरुवात करण्यात आली. ५३ हेक्टर परिसरातील तलावावर ६० लाख रुपये खर्च करून तलाव पुनरूज्जीवीत करण्यात आला.यासोबतच या तलावाच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. सद्यस्थितीत या तलावाच्या संचय क्षमतेत ६५ टक्के वाढ होणार आहे. पावसाळ्यात याचा अनुभवही परिसरातील नागरिकांना आला आहे.पूर्वी उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूमध्ये हा तलाव आटून जायचा. पाण्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण व्हायचा. आता या तलावाच्या पुनरूज्जीवनामुळे स्थानिक पातळीवर सकारात्मक बदल होतील. होसूर येथे ६० हेक्टरपर्यंत जलक्षमता तसेच ४.५ हेक्टर तलावाच्या पुनरूज्जीवनामुळे आसपासच्या परिसराला स्वच्छ पाणीपुरवठा मिळेल. सिंचन क्षमता वाढेल आणि मासेमारीसाठीही हा तलाव उपयुक्त ठरणार आहे.पुनरूज्जीवन तलाव ताब्यात देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भंडाराचे तहसीलदार अक्षय पोयाम, सरव्यवस्थापक एम.एम. लखोटे, मनुष्यबळ उपाध्यक्ष टी.शशीकुमार तसेच हिंदूजा फाउंडेशनचे संचालक नियती सरीन उपस्थित होते. जलजीवन कार्यक्रमांतर्गत सीएसआर प्रकल्पान्वये या प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करण्यात आले.तलावामुळे वाढीव पाणीपुरवठा होईलसरव्यवस्थापक एम.एम. लखोटे यांनी या कामाची माहिती दिली. तलावाचे पुनरूज्जीवन करताना पर्यावरणासोबतच समाजातील घटकांसाठी पाण्याचे महत्व लक्षात घेता हा प्रकल्प साकारण्यात आला. या तलावाच्या निवडीमध्ये एनव्हायरमेंटालिस्ट फाउंडेशन आॅफ इंडियाने महत्वाची भूमिका वठविली. किन्ही व गडेगाव या दोन्ही ग्रामपंचायतला या तलावामुळे वाढीव पाणीपुरवठा होणार आहे. सोबतच कोका अभयारण्यातील वन्य प्राण्यांनाही उन्हाळात पाण्यासाठी हा तलाव मोठा आधार ठरणार आहे. ही योजना दीर्घकाळ जलक्षमता कायम ठेवत उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना पुरेसा ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. किन्ही गडेगाव तलावाचे पुनरूज्जीवन झाले असून पावसामुळे हा तलाव तुडूंब भरला आहे. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला हा परिसर पर्यटकांना आकर्षीत करीत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी