शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉचिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
5
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
7
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
8
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
9
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
10
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
11
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
12
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
13
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
14
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
15
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
16
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
17
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
19
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
20
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा

विरलीत पिण्याच्या पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

रस्त्याचे रुंदीकरण झाले असून, रस्त्याच्या कडेने असलेली पाईपलाईन पुलाच्या बांधकामामुळे फुटली आहे. परिणामी या पाईपलाईनला यू टर्न देऊन पाईपलाईनची पुन्हा जोडणी करावी लागत आहे. मात्र, ही यू टर्न देऊन केलेली जोडणी पाईपलाईनमधील पाण्याच्या दाबापुढे टिकत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार पाईपलाईन सटकत आहे. त्यामुळे या पाईपलाईनची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले असून स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत.

ठळक मुद्देपाईपलाईन फुटली : तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, सरपंच म्हणतात पाणी मिळेल

लाेकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : सध्या सुरू असलेल्या ईटान ते विरली (बु.) रस्ता बांधकामात येथील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे येथे गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, गावकऱ्यांना भर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. येथे एक लाख २५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ असून सुमारे पाचशे वैयक्तिक नळजोडण्यांद्वारे गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो.सध्या सुरू असलेल्या विरली (बु.) ते ईटान रस्ता बांधकामांतर्गत या रस्त्यावरील छोटेखानी पुलांचे बांधकाम सुरू आहे. आता या रस्त्याचे रुंदीकरण झाले असून, रस्त्याच्या कडेने असलेली पाईपलाईन पुलाच्या बांधकामामुळे फुटली आहे. परिणामी या पाईपलाईनला यू टर्न देऊन पाईपलाईनची पुन्हा जोडणी करावी लागत आहे. मात्र, ही यू टर्न देऊन केलेली जोडणी पाईपलाईनमधील पाण्याच्या दाबापुढे टिकत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार पाईपलाईन सटकत आहे. त्यामुळे या पाईपलाईनची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले असून स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. या रस्त्यावर अशा प्रकारच्या एकूण सात पुलांचे बांधकाम प्रस्तावित असून भविष्यात अशी समस्या पुन्हा निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्राम प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याची गरज आहे.पाईपलाईनच्या सदर समस्येमुळे येथील नळांना गत तीन दिवसांपासून पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. येथे ११ हातपंप आहेत. मात्र, त्यांपैकी काही हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे चांगले पाणी येत असलेल्या हातपंपांवर महिलांची बेसुमार गर्दी होत असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांमध्ये भांडणे होत आहेत. काही नागरिक गावाशेजारच्या शेतातील मोटारपंपांवरून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. त्याचप्रमाणे येथील काही शेतकऱ्यांवर गुरांसाठी  ट्रॅक्टरने पाणी आणण्याची वेळ आली आहे.

विरली (बु.) ते ईटान रस्ताबांधकामात पाणीपुरवठा योजनेची सुमारे ४० मीटर पाईपलाईन फुटली. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सायंकाळपर्यंत गावकऱ्यांना नळांद्वारे पाणी मिळेल.-लोकेश भेंडारकर, सरपंच, विरली (बु.)

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई