शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

विरलीत पिण्याच्या पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

रस्त्याचे रुंदीकरण झाले असून, रस्त्याच्या कडेने असलेली पाईपलाईन पुलाच्या बांधकामामुळे फुटली आहे. परिणामी या पाईपलाईनला यू टर्न देऊन पाईपलाईनची पुन्हा जोडणी करावी लागत आहे. मात्र, ही यू टर्न देऊन केलेली जोडणी पाईपलाईनमधील पाण्याच्या दाबापुढे टिकत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार पाईपलाईन सटकत आहे. त्यामुळे या पाईपलाईनची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले असून स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत.

ठळक मुद्देपाईपलाईन फुटली : तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, सरपंच म्हणतात पाणी मिळेल

लाेकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : सध्या सुरू असलेल्या ईटान ते विरली (बु.) रस्ता बांधकामात येथील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे येथे गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, गावकऱ्यांना भर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. येथे एक लाख २५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ असून सुमारे पाचशे वैयक्तिक नळजोडण्यांद्वारे गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो.सध्या सुरू असलेल्या विरली (बु.) ते ईटान रस्ता बांधकामांतर्गत या रस्त्यावरील छोटेखानी पुलांचे बांधकाम सुरू आहे. आता या रस्त्याचे रुंदीकरण झाले असून, रस्त्याच्या कडेने असलेली पाईपलाईन पुलाच्या बांधकामामुळे फुटली आहे. परिणामी या पाईपलाईनला यू टर्न देऊन पाईपलाईनची पुन्हा जोडणी करावी लागत आहे. मात्र, ही यू टर्न देऊन केलेली जोडणी पाईपलाईनमधील पाण्याच्या दाबापुढे टिकत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार पाईपलाईन सटकत आहे. त्यामुळे या पाईपलाईनची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले असून स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. या रस्त्यावर अशा प्रकारच्या एकूण सात पुलांचे बांधकाम प्रस्तावित असून भविष्यात अशी समस्या पुन्हा निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्राम प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याची गरज आहे.पाईपलाईनच्या सदर समस्येमुळे येथील नळांना गत तीन दिवसांपासून पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. येथे ११ हातपंप आहेत. मात्र, त्यांपैकी काही हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे चांगले पाणी येत असलेल्या हातपंपांवर महिलांची बेसुमार गर्दी होत असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांमध्ये भांडणे होत आहेत. काही नागरिक गावाशेजारच्या शेतातील मोटारपंपांवरून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. त्याचप्रमाणे येथील काही शेतकऱ्यांवर गुरांसाठी  ट्रॅक्टरने पाणी आणण्याची वेळ आली आहे.

विरली (बु.) ते ईटान रस्ताबांधकामात पाणीपुरवठा योजनेची सुमारे ४० मीटर पाईपलाईन फुटली. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सायंकाळपर्यंत गावकऱ्यांना नळांद्वारे पाणी मिळेल.-लोकेश भेंडारकर, सरपंच, विरली (बु.)

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई