शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

विरलीत पिण्याच्या पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

रस्त्याचे रुंदीकरण झाले असून, रस्त्याच्या कडेने असलेली पाईपलाईन पुलाच्या बांधकामामुळे फुटली आहे. परिणामी या पाईपलाईनला यू टर्न देऊन पाईपलाईनची पुन्हा जोडणी करावी लागत आहे. मात्र, ही यू टर्न देऊन केलेली जोडणी पाईपलाईनमधील पाण्याच्या दाबापुढे टिकत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार पाईपलाईन सटकत आहे. त्यामुळे या पाईपलाईनची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले असून स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत.

ठळक मुद्देपाईपलाईन फुटली : तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, सरपंच म्हणतात पाणी मिळेल

लाेकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : सध्या सुरू असलेल्या ईटान ते विरली (बु.) रस्ता बांधकामात येथील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे येथे गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, गावकऱ्यांना भर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. येथे एक लाख २५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ असून सुमारे पाचशे वैयक्तिक नळजोडण्यांद्वारे गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो.सध्या सुरू असलेल्या विरली (बु.) ते ईटान रस्ता बांधकामांतर्गत या रस्त्यावरील छोटेखानी पुलांचे बांधकाम सुरू आहे. आता या रस्त्याचे रुंदीकरण झाले असून, रस्त्याच्या कडेने असलेली पाईपलाईन पुलाच्या बांधकामामुळे फुटली आहे. परिणामी या पाईपलाईनला यू टर्न देऊन पाईपलाईनची पुन्हा जोडणी करावी लागत आहे. मात्र, ही यू टर्न देऊन केलेली जोडणी पाईपलाईनमधील पाण्याच्या दाबापुढे टिकत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार पाईपलाईन सटकत आहे. त्यामुळे या पाईपलाईनची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले असून स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. या रस्त्यावर अशा प्रकारच्या एकूण सात पुलांचे बांधकाम प्रस्तावित असून भविष्यात अशी समस्या पुन्हा निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्राम प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याची गरज आहे.पाईपलाईनच्या सदर समस्येमुळे येथील नळांना गत तीन दिवसांपासून पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. येथे ११ हातपंप आहेत. मात्र, त्यांपैकी काही हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे चांगले पाणी येत असलेल्या हातपंपांवर महिलांची बेसुमार गर्दी होत असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांमध्ये भांडणे होत आहेत. काही नागरिक गावाशेजारच्या शेतातील मोटारपंपांवरून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. त्याचप्रमाणे येथील काही शेतकऱ्यांवर गुरांसाठी  ट्रॅक्टरने पाणी आणण्याची वेळ आली आहे.

विरली (बु.) ते ईटान रस्ताबांधकामात पाणीपुरवठा योजनेची सुमारे ४० मीटर पाईपलाईन फुटली. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सायंकाळपर्यंत गावकऱ्यांना नळांद्वारे पाणी मिळेल.-लोकेश भेंडारकर, सरपंच, विरली (बु.)

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई