शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पावसाचे साचलेले पाणी शिरले नागरिकांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:36 AM

पावसाळ्यात आनंदनगर परिसरात खाली जागेत शेती केली जात असल्याने तेथील पाणी आनंदनगरात राहणाऱ्या घरासमोर साचून राहते. दोन वर्षांपूर्वी ...

पावसाळ्यात आनंदनगर परिसरात खाली जागेत शेती केली जात असल्याने तेथील पाणी आनंदनगरात राहणाऱ्या घरासमोर साचून राहते. दोन वर्षांपूर्वी लहान मुलगा खेळत असताना पाण्यात पडून जीवितहानी झाली होती. तशीच भविष्यात होणारी दुर्घटना टाळता येणार नाही यासाठी नगर परिषद प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. घरासमोर आणि रस्त्यांवर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहने जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी वाहने रस्त्याच्या कडेला ठेवण्यात येतात. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बॉक्स

नगरसेवकाची नागरिकांना केवळ आश्वासने

आनंदनगरातील विविध समस्यांकडे वाॅर्ड मेंबर यांच्याकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे. केवळ पाहणी करून नागरिकांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. नगर परिषदेला वार्षिक घराचा कर भरूनही अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. वर्षानुवर्षे हीच समस्या कायम आहे. तरीही या समस्या नगर परिषद प्रशासनासह नगरसेवकाला दिसत नाहीत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पावसाळ्यात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून पक्क्या नाल्यांचे बांधकाम करून वारंवार जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी आनंद नगरातील रहिवाशांनी केली आहे.