शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने रबी हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासमवेत रंगपंचमी सण साजरा करत असतानाच अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले.

ठळक मुद्देमदतीची मागणी : लाखांदूर तालुक्याला जबर फटका, शेतकरी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : अवकाळी पावसाने तालुक्यातील रबी पीक संकटात आली असून होळीच्या पर्वात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, लाखोरी पिकांची काढणी सुरू असतानाच झालेल्सर जोरदार पावसाने पीक उध्वस्त झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे.
सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासमवेत रंगपंचमी सण साजरा करत असतानाच अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उसनवार करून पिकांची पेरणी केली होती. मात्र रबी हंगामात अनेकदा झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजावर संकट सापडले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि त्यानंतर रबी हंगामातील दोन ते तीनवेळा झालेल्या जोरदार पावसामुळे लाखांदूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. शेतात पीके चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र उत्पादनाला मोठा फटका बसणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना रबी हंगामातील पीक विम्यातून भरीव मदत देण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी धान पिकाचे उत्पादन चांगले झाले. मात्र त्याची विक्री करताना शेतकºयांना अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागला. आजही अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी टोकन मिळाले असतानाही खरेदी केंद्रांवर धान विक्री होत नाही. एकीकडे टोकन देवून शेतकºयांना दिलासा दिला जातो. तर दुसरीकडे महिना उलटला तरी शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्रावरील समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यासंदर्भात तहसीलदारांची भेट घेवून धान खरेदी केंद्रावरील समस्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर अद्यापही उपाययोजना झालेली नाही.

टॅग्स :Rainपाऊस