शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची फसवणूक करणारे सरकार

By admin | Updated: February 11, 2015 00:45 IST

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन देऊन निवडणूक जिंकून भाजप सत्तेत आली. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता येताच जनतेला दिलेल्या ...

लाखांदूर : मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन देऊन निवडणूक जिंकून भाजप सत्तेत आली. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता येताच जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता सर्व सामान्य जनतेच्या विरोधी निर्णय घेवून फक्त उद्योगपतीच्या स्वार्थ साधणारे हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे, असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. लाखांदूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.तालुका काँग्रेस कमेटीच्या तवीने मिरा-कन्हैय्या सभागृहामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री नितीन राऊत, माजी आमदार सेवक वाघाये यांची उपस्थिती होती. मनोहर राऊत, ताराचंद मातेरे, देविदास चौधरी, सवॉस दुनेदार, जगन जंगम, ज्ञानेश्वर गणविर, अनिल खोब्रागडे, राजु कोचे, धनपाल ठलाल यांच्या सह ४० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. तर भाजपाचे कार्यकर्ते लालदास देशमुख यांनीही काँग्रेस प्रवेश केला व लाखांदूर येथे युवा नेतृत्वात काम करणारी आर्यन्स ग्रुप संघटनेचे प्रमुख धम्मदीप रंगारी व सहकारी ७० युवकांनी काँग्रेस प्रवेश केला. माजी मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले की, ज्या लोकांनी आश्वासन देवून मते मागितली. त्यांनी त्यांची पूर्तता न करता आपल्याकडे पाठ फिरविली आहे. लाखांदूर तालुका हा दुर्लक्षित व गरीब लोकांचा आहे. या ठिकाणी कुठलेही मोठे उद्योग नाहीत. विकास कामे नाहीत. चार पदरी रस्ते नाहीत. या भागाशी माझी नाळ जुळली आहे. तरी या सरकारला धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या तुमच्या निवडणुकीत दाखवून दिले पाहिजे.सेवक वाघाये म्हणाले कार्यकर्त्यांनी एकत्र येवून भेदभाव विसरुन समोर येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्ष बळकटी करणे गरजेचे आहे. संचालन तालुका प्रभारी मनोहर महावाडे तर आभार प्रदर्शन संतोष दोनाडकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)