शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

श्वापदांचा धोका टाळण्यासाठी शौचालय बांधकामावर भर

By admin | Updated: February 19, 2017 00:22 IST

जंगलव्याप्त गाव म्हटल्यावर श्वापदांचा धोका संभवतो. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना वेळप्रसंगी जीव गमवावे लागते.

स्वच्छता मिशन कक्षाचा पुढाकार : हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरुभंडारा : जंगलव्याप्त गाव म्हटल्यावर श्वापदांचा धोका संभवतो. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना वेळप्रसंगी जीव गमवावे लागते. सोबतच उघड्यावर शौच केल्याने ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात येते. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आता ग्रामस्थ उघड्यावर शौचास जाणार नाही व त्यासाठी शौचालय बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त असलेल्या आसलपानी येथे ग्रामस्थांनी हा पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या पुढाकाराचा आदर्श जिल्ह्यातील अन्य गावांनेही घ्यावा असाच त्यांनी सुरु केलेल्या शौचालय बांधकामाच्या प्रगतीपथावरून दिसून येते. ओ.डी.एफ. अंतर्गत शौचालय बांधकाम करून गाव हागणदारीमुक्त करण्याचा मानस ग्रामपंचायत कमेटीने घेतला आहे. आसलपानी, मोटागाव, गारकाभोंगा व कारली या चार गावांची गटग्रामपंचायत असलेल्या आसलपानीला ओडीएफ अंतर्गत २८७ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २०९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा वापर करण्यात येत आहे. उर्वरीत शौचालयाच्या बांधकामाची कामे प्रगतीपथावर आहे. येत्या काही दिवसातच आसलपानी हे गाव हागणदारीमुक्त होण्याच्या दृष्टीने वाटचालीवर आहे. आसलपानी या गावाला हागणदारीमुक्त करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) सुधाकर आडे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी सरपंच रेखा मरसकोल्हे, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र पेंदाम, निला गोन्नाडे, शांता पेंदाम, माजी सरपंच नरेश पेंदाम, विस्तार अधिकारी घटारे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, समूह समन्वयक शशीकांत घोडीचोर, ग्रामपंचायत कर्मचारी ठाकरे, जलसुरक्षक रमेश गौपाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसलपानी ग्रामपंचायतीला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विविध उपक्रम, सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांना शौचालय बांधकाम करण्याची जनजागृती करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)गावाची ओळख निर्माण करा - आडेगाव हागणदारीमुक्त केल्याशिवाय विकासाच्या दिशेने नेता येत नाही. हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी वॉर्डनिहाय, सदस्य निहाय दिवसागणिक नियोजनाची गरज आहे. यात स्वच्छता मिशन कक्षाचे पथक सहभागी होऊन चालणार नाही तर ग्रामस्थांनीही स्वत:ची ओळख ओळखून यात सहभागी व्हावे. शौचालय बांधणे हा मान सन्मानाचा विषय ठरला आहे. युवकांना उघड्यावर शौचास जाणे लज्जास्पद वाटत असल्याने ही एक महत्वाची बाब आहे. आरोग्य, शिक्षण व पाणी या मूलभूत गरजा योग्य असल्यास आरोग्य निरोगी राहील. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त करावे असे बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी मार्गदर्शन केले.