शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

तातडीने बोनस देऊन रबी धानाची उचल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST

भंडारा : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्‍यात येणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप प्रदान केलेली नाही. भंडारा, ...

भंडारा : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्‍यात येणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप प्रदान केलेली नाही. भंडारा, गोंदिया जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर अन्‍याय होतो आहे. सध्‍या शेतीची कामे सुरू झाली असून बी-बियाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी करावयास व शेतीकामास शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना त्‍यांच्‍या हक्‍काचा बोनस शासनाद्वारे देण्‍यात येत नाही. धान उत्‍पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. येत्या दहा दिवसांच्‍या आत धान उत्‍पादकांना बोनस न मिळाल्‍यास भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांसह आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी पालकमंत्री तथा आ. डॉ. परिणय फुके यांनी दिला. याबाबतचे पत्र त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिले.

डॉ. फुके यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्‍ट्र शासनाद्वारे धान उत्‍पादक शेतकऱ्यांना एप्रिल महिन्‍यामध्‍येच त्‍यांच्‍या हक्‍काचा बोनस मिळणे अपेक्षित होते; पण जून महिना उलटून चालला असताना अद्याप बोनस मिळालेला नाही. त्‍याचप्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्‍यात आलेल्‍या धानाचे पैसेसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शासनाद्वारे बिजाई पुरवठा करण्‍यात येतो. तो देखील अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्‍यामुळे गरीब शेतकऱ्यांना खाजगी दुकानातून महागात बिजाई खरेदी करावी लागत आहे. यामुळे त्‍यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बोनसपोटी शेतकऱ्यांचे ८०० कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत. एकीकडे वीजबिल थकीत आहे, म्हणून सरकार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहे तर दुसरीकडे त्यांच्या हक्काचे बोनसचे पैसे थकीत ठेवते ही सापत्न वागणूक का ? असा सवाल आ. फुके यांनी केला आहे.

सध्‍या शेतीची कामे सुरू झाले असताना गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीविषयक साहित्‍य खरेदीसाठी व शेतीकामासाठी पैशांची गरज असते. मात्र ऐन हंगामात शासनाकडून बोनस देण्‍यात आले नसल्‍यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांवरती अन्‍याय होत आहे. तसेच खरीप हंगाम सुरू झाला असताना सुद्धा अजूनपर्यंत उन्हाळी धानाची उचल शासनाने केली नसल्यामुळे शासन ऐन हंगामामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करून त्‍यांच्‍यावरती अन्‍याय करीत आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा अन्‍याय आपण कदापि सहन करणार नाही. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या हक्‍काचा बोनस तात्‍काळ न दिल्‍यास नाईलाजास्तव भंडारा व गोंदिया येथील पणन कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकून अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव करून शेतकऱ्यांना न्‍याय मिळवून देण्‍यात येईल, असा इशारा आ. परिणय फुके यांनी दिला आहे.