शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

भंडारा आगारातील ७२ पैकी एकही बस आगाराबाहेर निघालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:33 IST

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु असल्याने जिल्ह्यात शनिवार- रविवारी वीकेंड लॉकडाऊनाची घोषणा केल्याने बंद पाळण्यात ...

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु असल्याने जिल्ह्यात शनिवार- रविवारी वीकेंड लॉकडाऊनाची घोषणा केल्याने बंद पाळण्यात आला होता. या बंदला भंडारेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा आगारातील ७१ बसेस जागेवरच उभ्या होत्या. शनिवार आणि रविवार दोन दिवसात तब्बल १४ लाखांचे नुकसान भंडारा आगाराचे झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसस्थानकात स्थानिक प्रवासी फिरकलेच नसल्याचे चित्र दिसून आले. सर्वच शासकीय कार्यालये तसेच भंडारा बसस्थानकासह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यासोबतच मृतांचाही आकडा वाढतीवरच आहे. त्यामुळे प्रशासनही हतबल होताना दिसत आहे.

दोन दिवशी कडकडीत बंद पाळून जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात एसटी ही अत्यावश्यक सेवा म्हणून एसटी प्रवासी वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. मात्र तरीही बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील स्थानिक प्रवाशांनी प्रवासासाठी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. यावेळी काही भंडारा आगारात निवडक कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे प्रवासी नसल्यानेच एरव्ही गजबजलेले बसस्थानक शनिवार-रविवारी मात्र बाहेरील जिल्ह्यातील प्रवासी वगळता बस स्थानकात शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले.

बॉक्स

दोन दिवसात १४ लाखांच्या उत्पन्नाला फटका

राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहर वसले असल्याने भंडारा बसस्थानक हे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे बसस्थानक आहे. गोंदिया, रायपूर, छत्तीसगड, भिलाई या ठिकाणी जाणारे प्रवासी येथून येजा करतात. मात्र बंदमुळे प्रवासीच आले नाहीत. परिणामी महामंडळाच्या भंडारा आगाराला १४ लाखांचा फटका बसला.

२) नागपूर हे भंडाऱ्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असल्याने भंडारा ते नागपूर या बसेस दर अर्ध्या तासाला किमान एक तरी गाडी धावत असते. त्यामुळे कोरोना संसर्गातही धावणाऱ्या गाड्या मात्र शनिवार-रविवारी अपवादाने एकही धावलेली दिसून आली नाही.

३) शासकीय, अधिकारी, कर्मचारी शनिवार, रविवार साप्ताहिक सुटी असल्याने आलेच नाहीत. त्यामुळे एरवी नेहमी नागपूरवरून येणारे प्रवासी मात्र शनिवारी-रविवारी.................. नसल्याने भंडारा आगारातून एकही बस धावलीच नाही.

बॉक्स

एसटी कर्मचारी म्हणतात, ड्युटी असेल तरच बोलवा आम्हाला

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच एसटी महामंडळातही ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे आदेश काढले आहेत. एसटी महामंडळात तांत्रिक तसेच ज्या चालक, वाहकांची ड्युटी आहे त्यांनाच कामावर बोलवा, बाकी कर्मचाऱ्यांची गर्दी व्हायला नको असे आवाहनही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कोरोना ठरतोय एसटीला तोट्याचे कारण ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने गेल्या काही दिवसापासून एसटीचे घटलेले उत्पन्न भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा एसटीची चाके थांबू लागली असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होऊ लागला आहे.

कोट

कोरोनामुळे प्रवासीच आले नाहीत. त्यातच प्रशासनाने पुकारलेल्या बंदमुळे बाहेरून येणाऱ्या बसगाड्या सोडल्या तर आगारातील एकही बस सोडण्यात आली नाही. मात्र बस सुरू झाल्या तरीही प्रवाशांनी तोंडाला मास्क, सॅनिटायझर वापरून कोरोना नियमांचे पालन करावे.

फाल्गुन राखडे,

आगारप्रमुख, भंडारा