शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांनी केले केवळ तीन टक्के पीक कर्ज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ टक्के केल्याने हे उद्दिष्ट ४८ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँकेची आघाडी : कोरोना संकटातही गतवर्षीसारखी अवस्था

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. विविध बँकांमध्ये कर्जासाठी उंबरठे झिजवत आहेत. अशा संकटाच्या काळातही पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका माघारल्याचे दिसत आहे. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच कर्जाचे वितरण या बँकांनी केले आहे. याउलट शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्ब्ल ७५ टक्के कर्ज वितरण करून यंदाही आघाडी घेतली आहे. वेळेवर पीक कर्ज मिळाले नाही, तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ टक्के केल्याने हे उद्दिष्ट ४८ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३९ हजार ४६७ शेतकऱ्यांना २०९ कोटींचे वितरण करण्यात आले. विदर्भ, कोकण बँकेला ३६ कोटी ७५ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १०३१ शेतकऱ्यांना ८० कोटी १ लाख म्हणजे २२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील खासगी बँकांना १९ कोटी ३८ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १२५ शेतकऱ्यांना एक कोटी ८७ लाखांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या १० टक्के कर्ज वितरण झाले आहे.दरवर्षी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरित करताना नकारघंटा देतात, असा अनुभव आहे. ऐनवेळेपर्यंतही कर्ज दिले जात नाही. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांना १२८ कोटी नऊ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ४८८ शेतकऱ्यांना ३६ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात २२ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. त्यापैकी ११ बँकांना पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, यापैकी केवळ बँका ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेने कर्ज वितरित केले आहे. इतर सात बँकांनी तर अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्याला कर्जाचे वितरण केले नाही.  

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू आहे. पीक कर्ज वाटपाची उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले आहे. -अशोक कुंभलवार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, भंडारा.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी