शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

राष्ट्रीयीकृत बँकांनी केले केवळ तीन टक्के पीक कर्ज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ टक्के केल्याने हे उद्दिष्ट ४८ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँकेची आघाडी : कोरोना संकटातही गतवर्षीसारखी अवस्था

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. विविध बँकांमध्ये कर्जासाठी उंबरठे झिजवत आहेत. अशा संकटाच्या काळातही पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका माघारल्याचे दिसत आहे. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच कर्जाचे वितरण या बँकांनी केले आहे. याउलट शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्ब्ल ७५ टक्के कर्ज वितरण करून यंदाही आघाडी घेतली आहे. वेळेवर पीक कर्ज मिळाले नाही, तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ टक्के केल्याने हे उद्दिष्ट ४८ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३९ हजार ४६७ शेतकऱ्यांना २०९ कोटींचे वितरण करण्यात आले. विदर्भ, कोकण बँकेला ३६ कोटी ७५ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १०३१ शेतकऱ्यांना ८० कोटी १ लाख म्हणजे २२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील खासगी बँकांना १९ कोटी ३८ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १२५ शेतकऱ्यांना एक कोटी ८७ लाखांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या १० टक्के कर्ज वितरण झाले आहे.दरवर्षी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरित करताना नकारघंटा देतात, असा अनुभव आहे. ऐनवेळेपर्यंतही कर्ज दिले जात नाही. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांना १२८ कोटी नऊ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ४८८ शेतकऱ्यांना ३६ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात २२ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. त्यापैकी ११ बँकांना पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, यापैकी केवळ बँका ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेने कर्ज वितरित केले आहे. इतर सात बँकांनी तर अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्याला कर्जाचे वितरण केले नाही.  

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू आहे. पीक कर्ज वाटपाची उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले आहे. -अशोक कुंभलवार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, भंडारा.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी