शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मनोऱ्यासाठी ना ठरावाची चिंता, ना मानवी जीवाचा मोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST

भंडारा : बदलत्या आधुनिक जीवनशैलीत मानवी जीवाला कवडीमोल किंमत उरली, असे दिसू लागले आहे. हे साकोली येथील प्रभाग क्रमांक ...

भंडारा : बदलत्या आधुनिक जीवनशैलीत मानवी जीवाला कवडीमोल किंमत उरली, असे दिसू लागले आहे. हे साकोली येथील प्रभाग क्रमांक सातमधील तलाव वाॅर्डात भरवस्तीत उभारलेल्या मोबाईल मनोऱ्याच्या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. लोकांची संमती नसतानाही किंबहुना नगरपरिषदेत कुठलाही ठराव नसताना मोबाईल मनोरा उभारण्यात आला. त्यामुळे कुणीही कुठेही ‘मनी पॉवरने’ मोबाईल मनोरा बांधकामाची सहजरित्या परवानगी घेऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.

कोरोना काळात दुसऱ्या लाटेअंतर्गत अनेकांचा जीव गेला. मानवी जीवाचे मोल काय असते, हे सांगायची गरज राहिली नाही. मात्र, आता मनुष्य मनुष्याच्या जीवाची फिकीर करीत नाही, असे जाणवत आहे. तलाव वॉर्डातील निर्माणाधीन मोबाईल मनोरा बांधकाम प्रकरणातही असेच घडले आहे. मानवी जीविताची किंमत कवडीमोल समजून भरवस्तीत मोबाईल मनोरा उभारण्यात आला आहे. मनोरा कार्यान्वित झाल्यानंतर त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा फटका मानवी जीवनावर किती घातक ठरतो, हे सांगण्याची गरज नाही. असे असतानाही अधिकारी व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनाही याची किंमत नसावी, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कुणाच्या दबावात ही परवानगी दिली, हे एक न समजणारे कोडे आहे.

भ्रष्टाचाराच्या गर्तेत फसलेली प्रशासन यंत्रणा कारवाई करण्यासाठी धजावत नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वाॅर्डवासीयांच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता मनोरा बांधकामाला परवानगी दिलीच कशी जाते? हा प्रश्न अनुत्तरीत असताना याचे गांभीर्य पालिका मुख्याधिकाऱ्यांना कळले कसे नाही? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. किंबहुना विद्यमान मुख्याधिकारीही या गंभीर समस्येकडे कानाडोळा करीत असतील तर दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्नही वाॅर्डवासीयांना पडला आहे.

बॉक्स

जिल्हाधिकारी लक्ष देणार काय?

साकोली शहरातील तलाव वाॅर्डात निर्माणाधीन मोबाईल मनोरा बांधकामात कुठलाही ठराव नगरपालिकेत घेण्यात आला नाही. वाॅर्डवासीयांनी एकदा सोडून दोनदा निवेदन दिले. त्यात मनोरा बांधकामामुळे आमच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हे बांधकाम अन्यत्र करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी केली आहे. मुख्याधिकारीही आश्वासन देऊन मोकळे झाले आहेत. मात्र, त्यांनी कुठलीच प्रशासनिक कारवाई केली नाही. पालिकेचे पदाधिकारी ही गप्प बसले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.