शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा प्रदूषण मुक्तीसाठी ‘नीरी’चा पुढाकार

By admin | Updated: June 14, 2016 00:18 IST

वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

स्वयंसेवी संस्थेला मिळाले पत्र : नगरपालिकेला प्रस्तावाची सूचनाभंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा स्थितीत वैनगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेने (नीरी) पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. या आशयाचे पत्र ग्रीन हेरीटेज बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्थेला प्राप्त झाले आहे. यात भंडारा नगर पालिका प्रशासनाला सुचित करून नदीच्या प्रदुषणाबाबत ‘नीरी’च्या माध्यमातून सर्व्हे करण्याची तयारी दर्शविली आहे. नागनदीचे घाण पाणी आणि जलपर्णी वनस्पती (ईकॉर्निया) यामुळे वैनगंगेचे पाणी दूषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रातून ही वनस्पती काढण्याचे काम प्रशासनाकडून अधुनमधून केले जाते. परंतु पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत ठोस उपयायोजना अद्यापही झालेली नासल्याने भंडारेकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु असून नागपुरातून येणाऱ्या नागनदीचे केमिकलयुक्त घाण पाणी वैनगंगा नदीत मिसळत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. विद्यमान स्थितीत भंडारेकरांना दूषित पाण्यामुळे विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत या समस्येवर रामबाण उपायांवर काम होणे अगत्याचे झाले आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषदद्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी बऱ्याच दिवसांपासून वैनगंगेचे पाणी पिणे बंद केले आहे. श्रीमंतांच्या घरी ‘आरो’ची सुविधा असली तरी गरिबांनी दूषित पाणी पिऊन आजार ओढून घ्यायचा काय, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात ग्रीन हेरिटेजचे अध्यक्ष मो.सईद शेख यांनी याबाबत ‘नीरी’शी पत्रव्यवहार सुरू केला आहे. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीच्या पाण्यात जाऊ न देता ते पाणी शुद्ध करण्याची गरज आहे. याबाबत नीरी संस्थेनेही पुढाकार घेण्याबाबत संमती दिल्याचे समजते. आता गरज आहे ती भंडारा नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराची. (प्रतिनिधी)