शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:21 IST

बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले.

ठळक मुद्देशेतीचे पंचनामे तत्काळ करा : जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले.हवामान विभागाच्या सूचनेप्रमाणे शेतकºयांनी भातपिकाच्या पेरणीला ७ जूनपासून सुरूवात केली होती. परंतु पाऊस न आल्यामुळे शेतकºयांनी पुन्हा ३० जूनपासून दुबार पेरणी केली. पण गोंदिया जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे भातपिकाची रोवणी केवळ १५ टक्केच झाली.रोवणी करण्याची शेवटची तारिख १५ आॅगस्ट असते. त्यानंतर रोवणी केली तर धानपीक अत्यल्प प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.धानाचे पीक पूर्णत: करपले असून आता धानपिकाची रोवणी करता येणार नाही. पालकमंत्री बडोले यांनी १५ आॅगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर जिल्ह्यात दुष्काळ घोषित करू, अशी घोषणा केली होती. परंतु या संदर्भात आतापर्यंत शासनाने काहीही घोषणा केली नाही.पाऊस अत्यल्प पडल्यामुळे शेती व पिण्यासाठी पाण्याची मोठी टंचाई आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा अन्यथा सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघातर्फे देण्यात आला आहे.निवेदन देताना संघाचे अध्यक्ष संजयसिंह टेंभरे, चुटियाचे सरपंच चंद्रकला तुरकर, उपसरपंच रामू शरणागत, माजी सरपंच रतनलाल बघेले, कुंडलीक तुरकर, डोमाजी टेंभरे, दुलीचंद कटरे, कुवरलाल शरणागत, मुन्नालाल तुरकर, दुर्गाप्रसाद कुरंजेकर, समलीक तुरकर, धनलाल गौतम, अशोक टेंभरे, जीवनलाल पटले, देवनाथ येलसरे, मुन्नालाल गौतम, हरिलाल गराकाटे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकºयांच्या मागण्यागोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती द्या, शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई द्या, जनावरांच्या चाºयाची छावणी ग्रामपंचायत पातळीवर सुरू करा, शेतकºयांचे कृषी पंपाचे विद्युत बिल पूर्ण माफ करा, शेतकºयांना नवीन कर्जाची व्यवस्था करून द्या, गावांमध्ये पिण्याचे पाणी कमी झाल्यामुळे े टँकर सुरू करा, रोहयोच्या कामांना तत्काळ मंजूर करून कामे सुरू करा, शेतमजुरांचे पलायन थांबविण्यासाठी त्यांना तात्काळ कामे द्या, ज्या बंद व अपूर्ण पाणी पुरवठा योजना आहेत त्यांना तत्काळ सुरू करा.