शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे नियोजन लाखनी तालुक्यासाठी करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

लाखनीः राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पापासून डाव्या कालव्यातून नवीन नहराचे नियोजन केल्यामुळे तसेच करचखेडा उपसासिंचन प्रकल्पापासून धान शेती ...

लाखनीः राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पापासून डाव्या कालव्यातून नवीन नहराचे नियोजन केल्यामुळे तसेच करचखेडा उपसासिंचन प्रकल्पापासून धान शेती साठी नवीन कालवे तयार केल्याने लाखनी तालुक्यातील ७ हजार ५५३ हेक्टर आर शेती शेत्र व साकोली तालुक्यातील ८ हजार ३२० हेक्टर आर शेतीमध्ये सिंचन व्यवस्था करून शेतकऱ्यांना दुष्काळापासून वाचविता येणार आहे. बारमाही पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यात मदत होणार असल्याचे निवेदन जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रणवीर भगत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख, आदींना दिले आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. शेतकरी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करतो उत्पन्न घेण्यास अडचणी येत असतात. केवळ आठ तास वीजपुरवठा केल्याने शेती पिकवण्यास अडचणी येतात विंधन विहिरी मुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. धान पिकाला लावलेली मजुरी,खत, बियाणे व इतर खर्चाचा विचार करता शेतकऱ्याला पुरेसे उत्पन्न मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. मुला मुलींचे शिक्षण व लग्नही करू शकत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ची घटना घडतांनी दिसून येत असल्याचे रणवीर भगत यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.

लाखनी तालुक्यातील गडेगाव, गोंडसावरी, सावरी, मुरमाडी (सावरी), लाखनी, लाखोरी, सालेभाटा, केसलवाडा (पवार), मोरगाव, पिंपळगाव (सडक), ह्या तलाठी साझ्यातील ३२ गावांना ७ हजार ५५३ हेक्टर आर शेती क्षेत्र नवीन नहराद्वारे सिंचन करता येणार आहे. साकोली तालुक्यातील ८ हजार ३२० हेक्टर आर शेती क्षेत्रातील १७ गावांना नवीन नहराचा लाभ होऊ शकतो असे निवेदनात भगत यांनी स्पष्ट केले आहे. तलावात नहराचे पाणी सोडल्यास शेतीला पाणी पुरवठा करता येईल. लाखनी व साकोली तालुक्यातील किन्ही, गडेगाव, रेंगेपार (कोठा), खुर्सिपार, लाखोरी, निलागोंदी, सालेभाटा, चिखलाबोडी, एकोडी, बाम्पेवाडा, उसगाव, चांदोरी, पिंडकेपार, घानोड येथील मोठ्या जलाशयात गोसेखुर्द नहराचे व उपसा सिंचनाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळेल.