शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुखसंपन्न महाराष्ट्र घडवीन

By admin | Updated: October 5, 2014 22:59 IST

जीवनात संकटे येत असतात. त्यांना सामोरे गेले पाहिजे. घाबरायचे नसते. शिवसेना प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे राज्यात कुणाची लाट आहे, हे येत्या १५ तारखेला मतदानातून

भंडाऱ्यात प्रचारसभा : उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहनभंडारा : जीवनात संकटे येत असतात. त्यांना सामोरे गेले पाहिजे. घाबरायचे नसते. शिवसेना प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे राज्यात कुणाची लाट आहे, हे येत्या १५ तारखेला मतदानातून दाखवूनच द्या, असे सांगून सुखसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेने योजना आखली आहे. या योजना तुम्हाला देणार आहे, परंतु ते मिळवायचे की नाही, हे आता तुम्हाला ठरवायचे आहे, त्यामुळे राज्यात शिवसेनेला सत्ता द्या, असे भावनिक आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.भंडारा येथे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख डॉ.दीपक सावंत, भंडारा जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार, उपजिल्हाप्रमुख सुनिल कुरंजेकर, लवकुश निर्वाण, हेमंत बांडेबुचे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, मला भारनियमनमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज कशी द्यायची, बेरोजगारांच्या हाताला काम कसे द्यायचे, विद्यार्थ्यांना ओझेमुक्तीसाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे, अशा संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी योजना तयार केली आहे. त्या मुलींचा मृत्यू गूढचमुरमाडीत तीन मुलींचा गूढ मृत्यू झाला. गेलेला जीव परत येणार नाही. परंतु मृत्यू कसा झाला हे सांगायला आघाडी सरकार तयार नाही. शेवटी सरकार म्हणते, त्या मुलींचा मृत्यू पाण्यात पाय घसरुन झाला. तुम्ही सांगा, या सरकारने महिलांना सुरक्षा दिली की वाऱ्यावर सोडले. गरीब जनतेची, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना हाकलून लावण्याची वेळ आली आहे. युती का तुटली माहीत नाहीराज्यात २५ वर्षांपासून युती आहे. अचानक युती का तोडली हे सांगायला ‘ते’ तयार नाहीत. ३४ जागा अतिरिक्त मागितल्या. कशा देणार एवढ्या जागा. आजवर माझ्या शिवसैनिकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. त्यांच्या हक्काची जागा सोडून देऊन ‘त्यांना’ खुष करायचे, माझ्या शिवसैनिकांशी प्रतारणा करायची, हे कुणी सांगितलं. आजवर संकटकाळात शिवसेनेची गरज होती आणि आता ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ असे करणाऱ्यांना जनता माफ करणार, नाही. राज्यात आम्ही २८७ जागा लढत आहोत. बीडमध्ये एक जागा सोडलेली आहे. मुंडे-ठाकरे कुटुंबियांचे ऋणानुबंध आहेत. आम्ही ते जपले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)