शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त बपेरा पुनर्वसन स्थळातील घरकुल दहा वर्षात झाले जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

२६ लोक मोहन भोयर तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे ...

२६ लोक

मोहन भोयर

तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे पुनर्वसन २०१०- २०११ मध्ये करण्यात आले. परंतु अवघ्या दहा वर्षात सदर घरकुल जीर्ण झाले असून घरकुलाची गच्चीला गळती लागली आहे. त्यामुळे स्लॅब कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे जीव मुठीत घेऊन १२५ कुटुंबीय वास्तव्य करीत आहे. मूलभूत सोयीसुविधांचा येथे अभाव आहे. कोट्यवधी रुपये त्यावर खर्च करण्यात आले. परंतु येथील बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत पूरग्रस्त कुटुंबांवर पुन्हा बेघर होण्याची वेळ आली आहे.

बपेरा गावातील १२५ पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाकडून सन २००७-२००८ मध्ये मान्यता मिळाली. सन २०१०-२०११ पर्यंत घरे बांधून पूर्ण झाली व पूरग्रस्तांना घरांचा ताबा देण्यात आला.परंतु अवघ्या दहा वर्षातच घरे जीर्ण झाली. त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक घरकुलात वास्तव्य करावे लागत आहे. तुमसर वाराशिवनी राष्ट्रीय महामार्गावर बापेरा हे गाव असून दरवर्षी वैनगंगा नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी गावात शिरते. त्यामुळे येथील सुमारे दीडशे घरांना त्याचा फटका बसतो. सुमारे दहा ते बारा वर्षापूर्वी नदीचे पाणी गावात शिरले होते व अनेक घरांची पडझड झाली होती. बेघर झालेल्यांना राज्यशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून घरकुल बांधून दिली. परंतु घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता निकृष्ट असल्यामुळे सदर घरकुलांना अवघ्या दहा वर्षातच गळती लागली आहे. शौचालय निरुपयोगी ठरले आहेत. गडर नाल्या यांचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले नाहीत. त्यांच्या घरांचे पट्टी अजून पर्यंत विद्यार्थी होणार नाही येथे योग्य रस्त्याचे बांध काम करण्यात आले नाही. अनेकांच्या घरी अजूनही वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना अंधारातच वास्तव्य करावे लागते.

बाधितांनी या संबंधीची तक्रार लोकप्रतिनिधी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. परंतु पावसाळा संपत आला तरी अजूनपर्यंत कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. इथे मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा प्रशासन करीत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजी खा.शिशुपाल पटले यांनी केली पाहणी: बपेरा येथील पुनर्वसन स्थळाला माजी खासदार पटले यांनी भेट दिली व पुनर्वसन स्थळी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून अत्यंत विदारक परिस्थितीत येथील नागरिक वास्तव्य करीत असल्याचे त्यांना आढळले.

यावेळी देवानंद लांजे, बपेरा च्य सरपंच ममता राऊत,डॉ. मुरलीधर बानेवार, सचिन खंगार, अरविंद पटले, शोभाराम राऊत, संदीप जटाळे, दिलीप मुळे, पुरुषोत्तम उपरिकार, हिरा उपरिकार, परवेश भूते, सुरेंद्र उपरिकार, चेतन रहांगडाले, गुरुदेव पारधी, उपसरपंच सोहन पारधी, नीलेश गोंडाने, सुनील शिवणे, झनक पटले, रवींद्र रहांगडाले,उमेश गजभिये, हिरालाल सहारे, लोकेश बम्हणोटे, सचिन रहांगडाले, सुनील पटले, संतोष गौतम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.