शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जंगलव्याप्त दहेगाव शेतशिवारात रानगव्यांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

सदर शिरकाव होताना या शेतशिवारतील विविध कडधान्य व गवत पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड आहे. दरम्यान, मोठ्या झाडांचे जंगल असलेल्या दहेगाव परिसरात या प्राण्यांना आवश्यक चारा उपलब्ध होत नसल्याने सदर रानगव्यांनी शेतशिवाराकडे कूच केल्याची जोरदार चर्चा आहे. तर अन्य वन्यप्राण्यांनीदेखील उन्हाळ्यापूर्वीच गावाकडे कूच केल्याचे सांगितले जात आहे. 

ठळक मुद्दे शेतपिकाचे अतोनात नुकसान

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील जंगलव्याप्त दहेगाव शेतशिवारात रानगव्यांच्या एका कळपाने हैदोस घातल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती लाखांदूर येथील वनपरिक्षेत्र विभागाला होताच या रानगव्यांना हाकलून लावण्यात संबंधित विभागाच्या अधिकारी,  कर्मचाऱ्यांना यश आले आहे.    माहितीनुसार, गत दोन दिवसापूर्वी तालुक्यातील दिघोरी/मोठी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील शेतशिवारात जवळपास २० ते २५  रानगव्यांनी शिरकाव केला.सदर शिरकाव होताना या शेतशिवारतील विविध कडधान्य व गवत पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड आहे. दरम्यान, मोठ्या झाडांचे जंगल असलेल्या दहेगाव परिसरात या प्राण्यांना आवश्यक चारा उपलब्ध होत नसल्याने सदर रानगव्यांनी शेतशिवाराकडे कूच केल्याची जोरदार चर्चा आहे. तर अन्य वन्यप्राण्यांनीदेखील उन्हाळ्यापूर्वीच गावाकडे कूच केल्याचे सांगितले जात आहे. तथापि, दोन दिवसापूर्वी रानगव्यांनी शेतशिवारात धुडगूस घातल्याने दहेगाव येथील तिकाराम डोंगरवार नामक शेतकऱ्यासह अन्य काही शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बोंब सुरू आहे. सदर घटनेची माहिती पीडित शेतकऱ्यांनी लाखांदूर येथील वनविभागाला दिली असता येथील वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित, क्षेत्रसहायक जे. के. दिघोरे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक एस. जी. खंडागळेसह काही वनमजूर व गावकऱ्यांनी जंगल परिसरात जाऊन रानगव्यांना हाकलून लावल्याची माहिती देण्यात आली आहे. वन विभागाने नुकसानग्रस्त शेतपिकाचे पंचनामे केले असून, शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली असल्याची माहिती देण्यात  आली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव