शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

‘त्या’ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 1:08 AM

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी समाजातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दहा जणांना ठार मारणाऱ्या आरोपींंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा भंडारा व नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स, स्टुडंट फेडरेशन तालुका शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रकरण उत्तर प्रदेशातील सोनभद्रचे, आदिवासी संघटनांनी पाठविले राष्ट्रपतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी समाजातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दहा जणांना ठार मारणाऱ्या आरोपींंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा भंडारा व नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स, स्टुडंट फेडरेशन तालुका शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनांनुसार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादावरून आदिवासी बांधवांवर गोळीबार करण्यात आला. यात दहा आदिवासींना जीव गमवावा लागला. तर २८ जण जखमी झालेले असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. घडलेले हत्याकांड लोकशाही प्रदान देशात लाजीरवाणी बाब आहे. कोणत्याह जटील प्रकरणाचा निकाल लावण्याकरिता विविध न्यायालयाचा अवलंब करण्यात येतो. परंतु देशामध्ये नीती मार्गाचा अवलंब न करता अनितीने आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न काही व्यभीचारी लोक करीत आहेत. अशा गुंडांना काही वरिष्ठ मंडळी पाठीशी घालून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी राज्य व केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन कुंभरे, सचिव डॉ.प्रमोद वरकडे तर नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स स्टूडंटस् फेडरेशनचे लाखनी तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे, शंकर उईके, कैलाश परतेकी, अमीत धंडारे, अमरसिंग उईके, शिवशंकर धुर्वे, धीरज उईके, प्रशांत सलामे, राजू सलामे, राकेश उईके, रवी धुर्वे, देवानंद धुर्वे, तेजराम कोकोडे, योगराज जुगनायके यांचा समावेश आहे.जलदगती न्यायालयात सुनावणी कराउत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे ज्या आदिवासींच्या जमिनीवर ताबा मिळवायचा आहे त्यांच्यावर आक्रमण करून त्यांची हत्या करण्यासाठी बाहेरगावावरून ३२ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गुंडांना आणण्यात आले. त्यांनी संपूर्ण गावाला वेढा घालून तेथील आदिवासींवर अंधाधुंद गोळीबार केला. आदिवासींवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असतानाही आरोपींना कठोर शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे आदिवासी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. सोनभद्र येथील आरोपींवर जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून अविलंब त्यांना फाशीवर चढविण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Sonbhadra Shootoutसोनभद्र हत्याकांड