शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १३० गावांना पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा, चुलबंध, सूर, कन्हान, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नद्या व नाल्या आहेत. पावसाळा आला की या नद्यांना पूर येतो. त्याचा फटका शेतीपिकांसह नदीतिरावरील गावांना बसतो. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून त्यापैकी १३० गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. यात भंडारा तालुक्यात नदी तिरावर ३८ गावे असून त्यापैकी २७ गावांना पूराचा धोका आहे.

ठळक मुद्देउपाययोजनांकडे दुर्लक्ष : पूर आला की रात्र काढावी लागते जीव मुठीत घेवून

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विशालपात्र असलेल्या वैनगंगा नदीसह इतर नदी-नाल्यांच्या तीरावर जिल्ह्यातील तब्बल १३० गावांना पूराचा कायम धोका आहे. उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अतिवृष्टी झाली की या गावातील नागरिकांना जीव मुठीत घेवून रात्र काढावी लागते. जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे असून त्यापैकी ८३ गावांना कायम धोका असतो.भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा, चुलबंध, सूर, कन्हान, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नद्या व नाल्या आहेत. पावसाळा आला की या नद्यांना पूर येतो. त्याचा फटका शेतीपिकांसह नदीतिरावरील गावांना बसतो. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून त्यापैकी १३० गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. यात भंडारा तालुक्यात नदी तिरावर ३८ गावे असून त्यापैकी २७ गावांना पूराचा धोका आहे. मोहाडी तालुक्यात १९ गावे नदीतिरावर असून १७ गावांना पुराचा धोका असतो. तुमसरमधील, २४ पवनी ३३, साकोली तीन, लाखांदूर तालुक्यातील २८ पैकी १८ आणि लाखनी तालुक्यातील ११ पैकी नऊ गावांना पुराचा धोका आहे.वर्षानुवर्ष ही गावे नदीच्या तीरावर आहेत. रेडझोनमधील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी उंचावर असलेल्या गावांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. मात्र या गावांना अतिवृष्टी झाली की पुराचा धोका असतो. वैनगंगा, चुलबंद, सूर या नद्यांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. अनेक गावातील नदीतिरावरील घरांचे पुनर्वसन केले तरी प्रश्न सुटू शकतो. परंतु या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नाही. तुमसर तालुक्यातील काही गावात तर नदीपात्र गावाच्या दिशेने येत आहे. भुस्खलन होत असल्याने तेथे धोका कायम असतो. प्रशासनाने पूरबाधित रेड आणि ब्ल्यु झोनमधील गावांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पांमुळेही अनेक गावात समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात प्रकल्पाच्या पाण्यात वाढ झाली की, अनेक गावांत वैनगंगेचे पाणी शिरते. पुनर्वसनाच्या समस्या कायम आहेत. नदी तीरावरील गावे आणि गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे प्रभावी होणाऱ्या गावातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नावर अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र प्रशासनाने पुरबाधित गावांचा प्रश्न कधीच सोडविला नाही. त्यामुळे पावसाळा आला की, या गावातील नागरिकांना जीव मुठीत घेवून रात्र काढावी लागते. घरांचे होणारे नुकसानही सहन करावे लागते.सर्वाधिक गावे वैनगंगेच्या तीरावरभंडारा जिल्ह्यातून वाहनाºया वैनगंगा नदीच्या तीरावर सर्वाधिक ९९ गावे आहेत. त्यापैकी ८३ गावांना पुराचा कायम धोका असतो. चुलबंद नदीच्या तिरावरील ३१ पैकी २१, सूर नदीच्या ११ पैकी सात, कन्हान नदीच्या चार पैकी तीन आणि बावनथडी नदीच्या नऊ पैकी नऊ गावांना पूराचा कायम धोका असतो. पवनी तालुक्यातील वैनगंगेच्या तिरावरील ३३ गावे रेडझोनमध्ये आहेत.पुनर्वसनानेच प्रश्न सुटू शकतोभंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, चुलबंद, सुर व इतर नदीतीरावरील गावांत पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गावात आणि घरात पूर शिरल्यानंतर संपूर्ण परिसर चिखलमय होऊन जातो. त्यामुळे आजाराची समस्या उद्भवते. घरांची डागडुजी करताना दरवर्षी मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. या सर्व प्रश्नांवर एकच उपाय तो म्हणजे नदी तीरावरील गावांचे पुर्णत: किंवा अंशत: पुनर्वसन करणे होय. 

टॅग्स :floodपूरRainपाऊस