शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सिहोऱ्यात राज्य मार्गावर गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:06 IST

तुमसर - बपेरा राज्य मार्गावर नाकाडोंगरी मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आल्यानंतर वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. याशिवाय राज्य मार्ग ...

तुमसर - बपेरा राज्य मार्गावर नाकाडोंगरी मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आल्यानंतर वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. याशिवाय राज्य मार्ग अरुंद असल्याने वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. असे असले तरी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे रोज राज्य मार्गावर अपघात होत असल्याने वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने राज्य मार्गावर गतिरोधक उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते. याशिवाय गतिरोधकांसाठी नागरिकांनी ओरड सुरू केली होती. दरम्यान, राज्य मार्गावरील सिहोरा गावात ग्रामीण सचिवालयाजवळ गतिरोधक उभारण्यात आले आहे. गतिरोधक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने कंजुषी केल्याचे आरोप गावकरी करीत आहेत. टी पॉइंटवर दोन्ही बाजूने गतिरोधक निर्माण करण्यात आले नाहीत. या शिवाय बँक ऑफ इंडिया चौकातही गतिरोधक निर्माण करण्याचे टाळण्यात आले आहे. दरम्यान, चुल्हाड, हरदोली, मोहगाव खंदान, सिंदपुरी, बपेरा, देवसरा, बिनाखी गावांचे बस स्थानक परिसरात गतिरोधक तयार करण्यात आले नाही. यामुळे भरधाव वेगाने वाहने धावत आहेत. याच बसस्थानक परिसरात अधिक अपघात झाले आहेत. गोंदेखारी बसस्थानकाशेजारी बँक असल्याने वाहनांचे गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची ओरड ग्राहक करीत आहेत; परंतु कुणी ऐकायला तयार नाही. संपूर्ण राज्य मार्ग अपघातग्रस्त झालेला असताना नूतनीकरणासाठी प्रयत्न केले जात नाहीत. अधूनमधून राज्य मार्ग दुरुस्तीच्या चर्चा रंगल्या आहेत; परंतु या कामास बळ मिळाले नाही. कधी निधी नसल्याचे सांगण्यात आले, तर कधी निविदा निघाल्याचे माहिती देण्यात आली आहे; परंतु भूमिपूजनाचे नावावर टिकास धावली नाही. एरवी श्रेयाचे राजकारण होत असताना लोकप्रतिनिधी मात्र शांत असल्याने राज्य मार्ग नूतनीकरणावरून शंका येत आहे. अरुंद असणाऱ्या राज्य मार्गाचे रुंदीकरण झाले पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

गावांतील रस्तेही भकास

कोरोना काळात राज्याची तिजोरी रिकामी झाल्याने अनेक रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम लांबणीवर गेले आहे. ग्रामीण भागातील रस्ते निधीअभावी भकास झाले आहेत. ग्रामीण रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. बिनाखी ते गोंडीटोला मार्ग अशाच प्रकाराला बळी पडला आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत या मार्गाचे भूमिपूजन झाले; परंतु नंतर साधी गिट्टी आली नाही. रस्त्याचे डांबरीकरण लांबणीवर गेला असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. माडगी ते बपेरा गावापर्यंत जोडणाऱ्या रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे.