शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: March 17, 2017 00:31 IST

परिसरातील कांदा उत्पादकांनी मागीलवर्षी बसलेला फटका लक्षात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ

खर्च जास्त उत्पन्न कमी : कवडीमोल भावात विक्री चिचाळ : परिसरातील कांदा उत्पादकांनी मागीलवर्षी बसलेला फटका लक्षात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ फिरविल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पवनी तालुक्यात चिचाळ येथे मोठ्या प्रमाणात खरीप पीक निघल्यानंतर नगदी पीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र कांदा उत्पन्नावर निसर्गाची अवकृपा किटकनासक औषधी, रासायनिक खते आदी खर्च आवाक्याबाहेर होतो. वादळ पावसाचा तडाखा तर कधी रानडुकरांच्या हैदोसाने शेतकरी भरडला जातो. गेल्यावर्षीला चिचाळ येथे ८०० ते ९०० एकरात उत्पन्न घेतले होते. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही मिळाल्याने किंवा शासकीय आधारभूत केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना पडक्या भावात विक्री करावी लागली. काहींनी पडक्या भावात कांदा विकला खरा मात्र व्यापारी कांद्याचा ‘स्टॉक’ करून मालामाल झाला. त्यामुळे या वर्षाला बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा ऐवजी उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले. चिचाळ शेतशिवारातून जाणाऱ्या मुख्य डाव्या कालव्यालगत शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी शेतीची मशागत करून शेती सज्ज केली होती. मात्र गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे कामे सुरू असल्याने कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही. खर्च जास्त उत्पादन कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गडद छायेत फसला गेला. या जगाच्या पोशिंद्याला कर्जाच्या बेडीतून काढणार कोण, शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार असे अनेक प्रश्न बुद्धीजीवी करित आहेत. पवनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची मोठी कंपनी नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले गाव सोडून शहराकडे जात असतात. शेती व्यवसाय नेहमीच तोट्याचे असल्याने शेतीकडे नवीन पिढीचा कल बदलल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. कांद्याचा भाव कमी असल्याने मजुर, गाडीभाडा यामध्येच शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असतात. बळीराजाच्या समस्या शासन दरबारी लावून धराव्यात पवनी तालुक्यात एमआयडीसी प्रोजेक्ट कारखानदारी छोटे, मोठे शेतीला पुरक उद्योग धंदे आणावे लागतील तरच तालुक्यातील शेतकरी सुखावेल. (वार्ताहर)