शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: March 17, 2017 00:31 IST

परिसरातील कांदा उत्पादकांनी मागीलवर्षी बसलेला फटका लक्षात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ

खर्च जास्त उत्पन्न कमी : कवडीमोल भावात विक्री चिचाळ : परिसरातील कांदा उत्पादकांनी मागीलवर्षी बसलेला फटका लक्षात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ फिरविल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पवनी तालुक्यात चिचाळ येथे मोठ्या प्रमाणात खरीप पीक निघल्यानंतर नगदी पीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र कांदा उत्पन्नावर निसर्गाची अवकृपा किटकनासक औषधी, रासायनिक खते आदी खर्च आवाक्याबाहेर होतो. वादळ पावसाचा तडाखा तर कधी रानडुकरांच्या हैदोसाने शेतकरी भरडला जातो. गेल्यावर्षीला चिचाळ येथे ८०० ते ९०० एकरात उत्पन्न घेतले होते. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही मिळाल्याने किंवा शासकीय आधारभूत केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना पडक्या भावात विक्री करावी लागली. काहींनी पडक्या भावात कांदा विकला खरा मात्र व्यापारी कांद्याचा ‘स्टॉक’ करून मालामाल झाला. त्यामुळे या वर्षाला बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा ऐवजी उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले. चिचाळ शेतशिवारातून जाणाऱ्या मुख्य डाव्या कालव्यालगत शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी शेतीची मशागत करून शेती सज्ज केली होती. मात्र गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे कामे सुरू असल्याने कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही. खर्च जास्त उत्पादन कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गडद छायेत फसला गेला. या जगाच्या पोशिंद्याला कर्जाच्या बेडीतून काढणार कोण, शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार असे अनेक प्रश्न बुद्धीजीवी करित आहेत. पवनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची मोठी कंपनी नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले गाव सोडून शहराकडे जात असतात. शेती व्यवसाय नेहमीच तोट्याचे असल्याने शेतीकडे नवीन पिढीचा कल बदलल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. कांद्याचा भाव कमी असल्याने मजुर, गाडीभाडा यामध्येच शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असतात. बळीराजाच्या समस्या शासन दरबारी लावून धराव्यात पवनी तालुक्यात एमआयडीसी प्रोजेक्ट कारखानदारी छोटे, मोठे शेतीला पुरक उद्योग धंदे आणावे लागतील तरच तालुक्यातील शेतकरी सुखावेल. (वार्ताहर)