शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: March 17, 2017 00:31 IST

परिसरातील कांदा उत्पादकांनी मागीलवर्षी बसलेला फटका लक्षात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ

खर्च जास्त उत्पन्न कमी : कवडीमोल भावात विक्री चिचाळ : परिसरातील कांदा उत्पादकांनी मागीलवर्षी बसलेला फटका लक्षात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ फिरविल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पवनी तालुक्यात चिचाळ येथे मोठ्या प्रमाणात खरीप पीक निघल्यानंतर नगदी पीक म्हणून कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र कांदा उत्पन्नावर निसर्गाची अवकृपा किटकनासक औषधी, रासायनिक खते आदी खर्च आवाक्याबाहेर होतो. वादळ पावसाचा तडाखा तर कधी रानडुकरांच्या हैदोसाने शेतकरी भरडला जातो. गेल्यावर्षीला चिचाळ येथे ८०० ते ९०० एकरात उत्पन्न घेतले होते. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही मिळाल्याने किंवा शासकीय आधारभूत केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना पडक्या भावात विक्री करावी लागली. काहींनी पडक्या भावात कांदा विकला खरा मात्र व्यापारी कांद्याचा ‘स्टॉक’ करून मालामाल झाला. त्यामुळे या वर्षाला बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा ऐवजी उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले. चिचाळ शेतशिवारातून जाणाऱ्या मुख्य डाव्या कालव्यालगत शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी शेतीची मशागत करून शेती सज्ज केली होती. मात्र गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे कामे सुरू असल्याने कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही. खर्च जास्त उत्पादन कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गडद छायेत फसला गेला. या जगाच्या पोशिंद्याला कर्जाच्या बेडीतून काढणार कोण, शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार असे अनेक प्रश्न बुद्धीजीवी करित आहेत. पवनी तालुक्यात कोणत्याही प्रकारची मोठी कंपनी नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मुले गाव सोडून शहराकडे जात असतात. शेती व्यवसाय नेहमीच तोट्याचे असल्याने शेतीकडे नवीन पिढीचा कल बदलल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. कांद्याचा भाव कमी असल्याने मजुर, गाडीभाडा यामध्येच शेतकऱ्यांचे पैसे खर्च होत असतात. बळीराजाच्या समस्या शासन दरबारी लावून धराव्यात पवनी तालुक्यात एमआयडीसी प्रोजेक्ट कारखानदारी छोटे, मोठे शेतीला पुरक उद्योग धंदे आणावे लागतील तरच तालुक्यातील शेतकरी सुखावेल. (वार्ताहर)