शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

कारखान्यात आठ कोटी रूपयांची साखर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:34 IST

भंडारा जिल्हा धान उत्पादक असून येथील शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले. हा ऊस देव्हाडा येथील साखर कारखान्याला दिला. सुमारे आठ हजार शेतकऱ्यांचे ७ कोटी ९० लाख रूपये कारखान्यावर थकीत आहेत. ऊस गळप हंगामात साखेरचा दर ३८ रूपये होता. सध्या साखरेचा दर २६ रूपये किलोग्रॅम आहे.

ठळक मुद्देआठ हजार शेतकऱ्यांचे आठ कोटी रूपये थकीत :साखरेचे दर वधारल्याने कारखान्यातून साखर विक्री बंद

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्हा धान उत्पादक असून येथील शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले. हा ऊस देव्हाडा येथील साखर कारखान्याला दिला. सुमारे आठ हजार शेतकऱ्यांचे ७ कोटी ९० लाख रूपये कारखान्यावर थकीत आहेत. ऊस गळप हंगामात साखेरचा दर ३८ रूपये होता. सध्या साखरेचा दर २६ रूपये किलोग्रॅम आहे. दर नाही म्हणून साखर कारखान्याने विक्री केली नाही असे सांगण्यात येत आहे. कारखान्यात सध्या सुमारे ८ कोटीपेक्षा जास्त रूपयांची साखर पडून आहे.भंडारा जिल्ह्यात एकमेव मानस साखर कारखाना देव्हाडा येथे आहे. जिल्ह्यातील सुमारे आठ हजार शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. संपूर्ण ऊस मानस कारखान्याला शेतकऱ्यांनी विक्री केला. कारखान्याने शेतकऱ्यांना केवळ अर्धे पैसे दिले. ऊर्वरित पैसे अद्याप दिलेले नाही. अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून ऊसाची लागवड केली होती. त्यामुळे व्याजाचे पैसे वाढत आहे. पावसाळा सुरू झाला असून धानाची पेरणी व इतर कामे करावयाची आहेत.शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्यामुळे त्यांच्यासमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांकडून २८ कोटींचा उस खरेदी केला आहे. त्यापैकी २० कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून ऊर्वरित ८ कोटी रूपये काही दिवसात देण्यात येणार असल्याचे समजते. कारखान्यातील गोदामात सुमारे १ लाख २७ हजार मेट्रीक टन साखर पडून आहे. या साखर कारखान्यात सुमारे २५० कामगार आहेत.या कारखान्याची ऊस गाळप करण्याची क्षमता २ लाख मेट्रिक टन आहे, पंरतु यावर्षी केवळ १ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले. पुढीलवर्षी दोन ते अडीच लाख टन ऊस गाळप होण्याची शक्यता आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यास भंडारा जिल्ह्यात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. नियमित व वेळेवर ऊसाचे पैसे मिळत नसल्यामुळे ऊस पीक घेणे बंद करावे? या विवंचनेत येथील ऊस उत्पादक शेतकरी साबडला आहे.यावर्षी २८ कोटींचा ऊस शेतकऱ्यांकडून खरेदी केला. ८ कोटी रुपये लवकरच देण्यात येतील. दरवर्षी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात येतो. सध्या साखरेचे दर कमी झाल्याने कारखान्याने साखर विक्री केली नाही. साखर विक्री करुन शेतकऱ्यांचे सर्व पैसे देण्यात येतील.- विनोद राऊत, व्यवस्थापक मानस कारखाना देव्हाडा.साखरेचे दर कमी आहे म्हणून साखर विक्री केली नाही. शेतकऱ्यांनी वाढ होण्याची वाट पाहावी का? धानाचा हंगाम सुरु झाला आहे. भाव कमी जास्त होणे ही प्रक्रिया आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये. अन्यथा आंदोलन करावे लागेल.- डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते तुमसर.८ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ८ कोटी रुपये थकीत आहे. कारखान्यात साखर पडून आहे. धानपीक लावायचे कसे, पुन्हा कर्ज घेऊन धानपिक लावून कर्जबाजारी व्हायचे का, कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत रक्कम द्यावी.- भुपेंद्र पवनकर, शेतकरी देव्हाडा.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने