शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

कारखान्यात आठ कोटी रूपयांची साखर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:34 IST

भंडारा जिल्हा धान उत्पादक असून येथील शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले. हा ऊस देव्हाडा येथील साखर कारखान्याला दिला. सुमारे आठ हजार शेतकऱ्यांचे ७ कोटी ९० लाख रूपये कारखान्यावर थकीत आहेत. ऊस गळप हंगामात साखेरचा दर ३८ रूपये होता. सध्या साखरेचा दर २६ रूपये किलोग्रॅम आहे.

ठळक मुद्देआठ हजार शेतकऱ्यांचे आठ कोटी रूपये थकीत :साखरेचे दर वधारल्याने कारखान्यातून साखर विक्री बंद

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्हा धान उत्पादक असून येथील शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले. हा ऊस देव्हाडा येथील साखर कारखान्याला दिला. सुमारे आठ हजार शेतकऱ्यांचे ७ कोटी ९० लाख रूपये कारखान्यावर थकीत आहेत. ऊस गळप हंगामात साखेरचा दर ३८ रूपये होता. सध्या साखरेचा दर २६ रूपये किलोग्रॅम आहे. दर नाही म्हणून साखर कारखान्याने विक्री केली नाही असे सांगण्यात येत आहे. कारखान्यात सध्या सुमारे ८ कोटीपेक्षा जास्त रूपयांची साखर पडून आहे.भंडारा जिल्ह्यात एकमेव मानस साखर कारखाना देव्हाडा येथे आहे. जिल्ह्यातील सुमारे आठ हजार शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. संपूर्ण ऊस मानस कारखान्याला शेतकऱ्यांनी विक्री केला. कारखान्याने शेतकऱ्यांना केवळ अर्धे पैसे दिले. ऊर्वरित पैसे अद्याप दिलेले नाही. अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून ऊसाची लागवड केली होती. त्यामुळे व्याजाचे पैसे वाढत आहे. पावसाळा सुरू झाला असून धानाची पेरणी व इतर कामे करावयाची आहेत.शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्यामुळे त्यांच्यासमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांकडून २८ कोटींचा उस खरेदी केला आहे. त्यापैकी २० कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून ऊर्वरित ८ कोटी रूपये काही दिवसात देण्यात येणार असल्याचे समजते. कारखान्यातील गोदामात सुमारे १ लाख २७ हजार मेट्रीक टन साखर पडून आहे. या साखर कारखान्यात सुमारे २५० कामगार आहेत.या कारखान्याची ऊस गाळप करण्याची क्षमता २ लाख मेट्रिक टन आहे, पंरतु यावर्षी केवळ १ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले. पुढीलवर्षी दोन ते अडीच लाख टन ऊस गाळप होण्याची शक्यता आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यास भंडारा जिल्ह्यात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. नियमित व वेळेवर ऊसाचे पैसे मिळत नसल्यामुळे ऊस पीक घेणे बंद करावे? या विवंचनेत येथील ऊस उत्पादक शेतकरी साबडला आहे.यावर्षी २८ कोटींचा ऊस शेतकऱ्यांकडून खरेदी केला. ८ कोटी रुपये लवकरच देण्यात येतील. दरवर्षी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात येतो. सध्या साखरेचे दर कमी झाल्याने कारखान्याने साखर विक्री केली नाही. साखर विक्री करुन शेतकऱ्यांचे सर्व पैसे देण्यात येतील.- विनोद राऊत, व्यवस्थापक मानस कारखाना देव्हाडा.साखरेचे दर कमी आहे म्हणून साखर विक्री केली नाही. शेतकऱ्यांनी वाढ होण्याची वाट पाहावी का? धानाचा हंगाम सुरु झाला आहे. भाव कमी जास्त होणे ही प्रक्रिया आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये. अन्यथा आंदोलन करावे लागेल.- डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते तुमसर.८ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ८ कोटी रुपये थकीत आहे. कारखान्यात साखर पडून आहे. धानपीक लावायचे कसे, पुन्हा कर्ज घेऊन धानपिक लावून कर्जबाजारी व्हायचे का, कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत रक्कम द्यावी.- भुपेंद्र पवनकर, शेतकरी देव्हाडा.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने