शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

‘औषध फवारलं तरी वाहून जातं’ भंडाऱ्यातील १.८२ लाख हेक्टरवर 'करपा' रोगाचा कहर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:45 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण : सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख उत्पन्न साधन असलेली धान शेती आता धोक्यात आली आहे. सततच्या पावसामुळे करपा रोग वेगाने पसरल्याने तब्बल १ लाख ८२ हजार हेक्टरवरील पीक बाधित होण्याची भीती वर्तविली जात आहे. सातही तालुक्यांत हा रोग झपाट्याने वाढत असून, भातपिके तांबूस व पेंढ्यासारखी दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात आठवडाभरापासून आकाशातील ढग हटेनात, पावसाचा मारा थांबेना आणि औषधांची फवारणी केली, तर ती लगेचच वाहून जाईल, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकले आहेत. कृषी खात्याने रोगप्रतिकारक कीटकनाशकांच्या फवारणीचे मार्गदर्शन केले असले, तरी परिस्थिती 'जैसे थे'च आहे. शेतामध्ये पीक वाचविण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी औषधे लागलीच वाहून जातात. त्याचा काहीही फायदा दिसत नाही, अशी खंत विनोद पचघरे या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

मे महिन्यापासून अवकाळीची मालिका

जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाची मालिका सुरू झाली. सुरुवातीला पिके हिरवीगार झाली, परंतु मागील महिनाभरापासून सतत पाऊस सुरू राहिल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. भातपिकाला उष्णतेची गरज असताना आभाळ सतत दाटून येत असल्याने शेतकरी डोळ्यांसमोर उभी केलेली शेती नष्ट होताना पाहत आहेत.

गत वर्षीही सोसावे लागले नुकसान

मागच्या वर्षीही खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे यंदा पुन्हा अशी वेळ येणार का, या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अतिवृष्टीने उत्पादन घटण्याचा अंदाज

सध्या हलके वाणाचे धान पीक फुलोऱ्यावर आहे. तर भारी वाणाचे धान गर्भावस्थेत आहे. या काळात अतिवृष्टी झाल्यास फुलो-याचे मोठ्या प्रमाणात होत आहे. परागीकरणाची प्रक्रिया अडचणीत येत असल्याने धान पिकाचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यातच अतिवृष्टी व वादळाने धान पीक जमिनीवर लोळले असल्याने मातीमोल ठरत आहे. 

उन्हाळीच्या भरपाईपासून शेतकरी वंचित

जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वादळी पावसाने उन्हाळी धान पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. परंतु, यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणात घोळ झाल्याने शेतकऱ्यांकडून फेर चौकशीची मागणी होत आहे.

"जिल्ह्यात हलके धान पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतांना नैसर्गिक संकटांची मालिका सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह रोजच पाऊस बरसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल आहे. हाती आलेले धान पीक नुकसानग्रस्त होऊन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे."- राधेश्याम आगासे, शेतकरी निलज खुर्द. 

टॅग्स :PaddyभातCropपीकfarmingशेतीFarmerशेतकरी