शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘औषध फवारलं तरी वाहून जातं’ भंडाऱ्यातील १.८२ लाख हेक्टरवर 'करपा' रोगाचा कहर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:45 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण : सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख उत्पन्न साधन असलेली धान शेती आता धोक्यात आली आहे. सततच्या पावसामुळे करपा रोग वेगाने पसरल्याने तब्बल १ लाख ८२ हजार हेक्टरवरील पीक बाधित होण्याची भीती वर्तविली जात आहे. सातही तालुक्यांत हा रोग झपाट्याने वाढत असून, भातपिके तांबूस व पेंढ्यासारखी दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात आठवडाभरापासून आकाशातील ढग हटेनात, पावसाचा मारा थांबेना आणि औषधांची फवारणी केली, तर ती लगेचच वाहून जाईल, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकले आहेत. कृषी खात्याने रोगप्रतिकारक कीटकनाशकांच्या फवारणीचे मार्गदर्शन केले असले, तरी परिस्थिती 'जैसे थे'च आहे. शेतामध्ये पीक वाचविण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी औषधे लागलीच वाहून जातात. त्याचा काहीही फायदा दिसत नाही, अशी खंत विनोद पचघरे या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

मे महिन्यापासून अवकाळीची मालिका

जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाची मालिका सुरू झाली. सुरुवातीला पिके हिरवीगार झाली, परंतु मागील महिनाभरापासून सतत पाऊस सुरू राहिल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. भातपिकाला उष्णतेची गरज असताना आभाळ सतत दाटून येत असल्याने शेतकरी डोळ्यांसमोर उभी केलेली शेती नष्ट होताना पाहत आहेत.

गत वर्षीही सोसावे लागले नुकसान

मागच्या वर्षीही खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे यंदा पुन्हा अशी वेळ येणार का, या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अतिवृष्टीने उत्पादन घटण्याचा अंदाज

सध्या हलके वाणाचे धान पीक फुलोऱ्यावर आहे. तर भारी वाणाचे धान गर्भावस्थेत आहे. या काळात अतिवृष्टी झाल्यास फुलो-याचे मोठ्या प्रमाणात होत आहे. परागीकरणाची प्रक्रिया अडचणीत येत असल्याने धान पिकाचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यातच अतिवृष्टी व वादळाने धान पीक जमिनीवर लोळले असल्याने मातीमोल ठरत आहे. 

उन्हाळीच्या भरपाईपासून शेतकरी वंचित

जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वादळी पावसाने उन्हाळी धान पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. परंतु, यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणात घोळ झाल्याने शेतकऱ्यांकडून फेर चौकशीची मागणी होत आहे.

"जिल्ह्यात हलके धान पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतांना नैसर्गिक संकटांची मालिका सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह रोजच पाऊस बरसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल आहे. हाती आलेले धान पीक नुकसानग्रस्त होऊन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे."- राधेश्याम आगासे, शेतकरी निलज खुर्द. 

टॅग्स :PaddyभातCropपीकfarmingशेतीFarmerशेतकरी