शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘औषध फवारलं तरी वाहून जातं’ भंडाऱ्यातील १.८२ लाख हेक्टरवर 'करपा' रोगाचा कहर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:45 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण : सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख उत्पन्न साधन असलेली धान शेती आता धोक्यात आली आहे. सततच्या पावसामुळे करपा रोग वेगाने पसरल्याने तब्बल १ लाख ८२ हजार हेक्टरवरील पीक बाधित होण्याची भीती वर्तविली जात आहे. सातही तालुक्यांत हा रोग झपाट्याने वाढत असून, भातपिके तांबूस व पेंढ्यासारखी दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात आठवडाभरापासून आकाशातील ढग हटेनात, पावसाचा मारा थांबेना आणि औषधांची फवारणी केली, तर ती लगेचच वाहून जाईल, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकले आहेत. कृषी खात्याने रोगप्रतिकारक कीटकनाशकांच्या फवारणीचे मार्गदर्शन केले असले, तरी परिस्थिती 'जैसे थे'च आहे. शेतामध्ये पीक वाचविण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी औषधे लागलीच वाहून जातात. त्याचा काहीही फायदा दिसत नाही, अशी खंत विनोद पचघरे या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

मे महिन्यापासून अवकाळीची मालिका

जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाची मालिका सुरू झाली. सुरुवातीला पिके हिरवीगार झाली, परंतु मागील महिनाभरापासून सतत पाऊस सुरू राहिल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. भातपिकाला उष्णतेची गरज असताना आभाळ सतत दाटून येत असल्याने शेतकरी डोळ्यांसमोर उभी केलेली शेती नष्ट होताना पाहत आहेत.

गत वर्षीही सोसावे लागले नुकसान

मागच्या वर्षीही खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे यंदा पुन्हा अशी वेळ येणार का, या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अतिवृष्टीने उत्पादन घटण्याचा अंदाज

सध्या हलके वाणाचे धान पीक फुलोऱ्यावर आहे. तर भारी वाणाचे धान गर्भावस्थेत आहे. या काळात अतिवृष्टी झाल्यास फुलो-याचे मोठ्या प्रमाणात होत आहे. परागीकरणाची प्रक्रिया अडचणीत येत असल्याने धान पिकाचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यातच अतिवृष्टी व वादळाने धान पीक जमिनीवर लोळले असल्याने मातीमोल ठरत आहे. 

उन्हाळीच्या भरपाईपासून शेतकरी वंचित

जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वादळी पावसाने उन्हाळी धान पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. परंतु, यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणात घोळ झाल्याने शेतकऱ्यांकडून फेर चौकशीची मागणी होत आहे.

"जिल्ह्यात हलके धान पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतांना नैसर्गिक संकटांची मालिका सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह रोजच पाऊस बरसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल आहे. हाती आलेले धान पीक नुकसानग्रस्त होऊन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे."- राधेश्याम आगासे, शेतकरी निलज खुर्द. 

टॅग्स :PaddyभातCropपीकfarmingशेतीFarmerशेतकरी