शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दमुळे हजारो हेक्टर धानाला 'नवसंजीवनी'

By admin | Updated: September 20, 2014 23:43 IST

गोसेखुर्द धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी, येथील ग्रामस्थांनी त्यांचे साहित्य जुन्याच गावात ठेवले आहे. धरण प्रशासनाने पाणी सोडल्याने ते गावात शिरले. त्यामुळे ग्रामस्थांना

गोसे (बुज.) : गोसेखुर्द धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी, येथील ग्रामस्थांनी त्यांचे साहित्य जुन्याच गावात ठेवले आहे. धरण प्रशासनाने पाणी सोडल्याने ते गावात शिरले. त्यामुळे ग्रामस्थांना याचा फटका बसला. ग्रामस्थांचे नुकसान होऊ नये म्हणून गोसे प्रकल्प कार्यालयाने गावकऱ्यांना सहा दिवसांचा अवधी दिला आहे. यादरम्यान पाणी सोडणे स्थिर राहणार आहे. गोसेचे पाणी धान पिकासाठी नवसंजीवनी ठरली आहे.या कालव्यातील पाणी चौरास पर्यंत जावून पोहचले आहे. धरणातील २४१ मीटरवर गेल्यावर वाहत्या पाण्याला वेग येणार आहे. शनिवारी धरणातील पाण्याचा जलस्तर २३९.६०० मीटर होता. प्रकल्पग्रस्तांना आपल्या जुन्या गावातून घराचे साहित्य काढून नवीन गावठाणात स्थानांतरण करण्याकरिता आज धरणाचा जलस्तर २३९.६०० मीटरवर स्थिर ठेवून जलस्तर वाढविण्याचे तात्पुरते थांबविलेले आहे. दुपारी ३ नंतर धरणाचे २ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे. पण २५ तारखेच्या नंतर धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम परत सुरू केल्या जाणार आहे.पुरेशा पाऊस न आल्यामुळे धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर होते. शेतजमिनीला भेगा पडणे सुरू झाले होते.गोसीखुर्द परिसरासोबतच चौरास भागातील शेतकऱ्यांनीही धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली. डावा कालवा विभागाने पाणी सोडले. दोन दिवसापासून पाथरी गावाजवळच्या डाव्या कालव्याचे दोन्ही दारे उघडण्यात आली आहेत. या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी आहे. पण धरणाचा जलस्तर २४१.०० मिटरवर पोहचल्यावर कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याला गती येणार आहे. २४१.०० मिटरवरच नेरला उपसा सिंचन योजना सुरू होणार असल्यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीला सिंचन होणार आहे. डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा फायदा गोसेबुज, आकोट, चिचाळ, कोंढा, कोसरा, सोमनाळा, सेंद्रीखुर्द, सेंद्रीबुज, रनाळा, भावड, खैरी, नवेगाव, मांगली आदी गावातील हजारो हेक्टर शेतजमिनीला झाला आहे. यावर्षी पाऊस बरोबर झाला नसल्यामुळे शेतकऱ्याच्या धान पिकाचे नुकसान होत होते. पण गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हजारो हेक्टर धान पिकाला नवसंजिवणी मिळाली आहे. (वार्ताहर)