शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात प्रतिबंध नाही

By admin | Updated: June 28, 2014 23:26 IST

गोंदिया जिल्ह्यातील अदानी विज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या धरण बांधकाम परिसरात प्रतिबंधीत क्षेत्राचे

पाच जणांना जलसमाधी : फलक, सुरक्षा गार्डचा अभाव
चुल्हाड (सिहोरा) : गोंदिया जिल्ह्यातील अदानी विज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या धरण बांधकाम परिसरात प्रतिबंधीत क्षेत्राचे फलक तथा सुरक्षा गार्डचा अभाव आहे. परीणामी जलसमाधी घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तिरोडा तालुक्यात अदानी वीज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प हे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर ४५० कोटी खर्चून धरण बांधकाम करण्यात आले आहे. अंदाजे दरवाजे असलेल्या या धरण बांधकामात पाणी अडविण्यास सुरूवात झाली आहे. या पाण्याचा विस्तार १८ कि़मी. अंतर पर्यंत नदी पात्रात आहे. या अंतरपर्यंत नदी काठावर गावाचे वास्तव्य आहेत. सिहोरा आणि तिरोडा या परिसरातील हे गावे आहेत. पाणी अडविण्यात आल्याने नदीचे पात्र धोक्याचे झाले आहे. बहुतांश नदी काठावरील गावांचे देवस्थान याच काठालगत आहेत. भक्त भाविक तथा यात्राचे नियोजन सदैव देवस्थान परिसरात आहेत. नदी पात्रात पाणीच पाणी असताना धोक्याचे पात्र तथा पोहण्यास प्रतिबंध घालणारे फलक नाहीत. या गावालगत प्रवास आणि वाहतुकी करीता नदी पात्रात डोंग्याचा उपयोग नागरिक करीत आहेत. परंतु हे डोंगे जीर्ण झाली आहेत. नियंत्रण भंडारा जिल्हा प्रशासनाचे असले तरी गोंदिया जिल्हा प्रशासन डोंगा घाट लिलावात काढत आहे. पावसाडा सुरू झाला असून वैनगंगा नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या धरणाचे दरवाजे उघडण्यात येत आहेत. यामुळे नदीपात्रात पाण्याच्या पातळीत चढ उतार होत आहेत. यामुळे डोंग्यातून प्रवास धोक्याचे झाले आहे. सुसज्ज डोंगे तथा नियंत्रण ठेवणाऱ्या उपाय योजनासाठी दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक होणे अत्यावश्यक आहे. नियोजन, कृतिआराखडा तथा कागदोपत्री निर्देशाने नारिकांचे जिवघेणे प्रश्न सुटणार नाहीत, असा प्रतिक्रिया गावकरी देत आहेत. सरंपच, पोलीस पाटीलांचे भ्रमणध्वनी क्रमांक तालुका प्रशासन तथा पोलीस प्रशासनाकडे आहेत. परंतु रात्री हे भ्रमणध्वनी नो कव्हरेजमध्ये सांगत आहेत. यामुळे नवे संकट निर्माण होणार आहेत. दरम्यान प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी कवलेवाडा मांडवी गावानजीक धरणाचे बांधकाम झाले आहे. पिपरी चुन्ही गाव हाकेच्या अंतरावर आहे. कुणी या गावचे पुनर्वसनाचे बोलत नाही. धरणाचे पाणी गावात थेट शिरत असतानाही सारेच आंधळे आणि बहीरे झाल्याची प्रचिती येत आहे. धरणात पाणी अडविण्यात आल्याने ग्रिन व्हॅली पर्यटन स्थळाची जागा आता या धरणाने घेतली आहे. भाविक तथा पर्यटक मोठ्या संख्येने या धरणाला भेट देत आहेत. धरणातील साठवणूक करण्यात आलेले पाणी धोकादायक आहे. या धरण परिसरात पोहण्याचा आनंद घेताना पाच जणांना जलसमाधी मिळाली आहे. दरम्यान मांडवी गावाच्या दिशेने असलेल्या पात्रात पाच जणांचा बळी गेला असल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याची ओरड आहे. (वार्ताहर)