शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या दूषित पाण्याची जलसंपदा मंत्र्यांकडे तक्रार

By admin | Updated: May 31, 2016 00:43 IST

भंडारावासीयांना गेले दोन वर्षापासून नागनदीचे मलमुत्रयुक्त दूषित पाणी प्यावे लागत आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निवेदन : नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांचेही जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्र्यांना साकडेभंडारा : भंडारावासीयांना गेले दोन वर्षापासून नागनदीचे मलमुत्रयुक्त दूषित पाणी प्यावे लागत आहे. परंतु अनेक अर्ज विनंत्या व निवेदने देवूनही प्रशासन शांत आहे. शहराचे व वैनगंगा नदी परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाग नदीचा प्रवाह बदलवून भंडारावासीयांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना करण्यात आली. सदर मागणी नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांच्यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. मोठ्या प्रमाणात इकार्निया वनस्पतीचे आच्छादन पसरले आहे. याबाबत विदर्भ राज्य आंदोलन समिती पुढे सरसावली असून आज जलसंपदा मंत्री गिरीश महाज यांना याबाबत निवेदन सादर करून जनतेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी करीत समितीने माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पद्माकर टेंभुर्णीकर यांचे नेतृत्वात ६४ पानांचे निवेदन सादर केले. यावेळी मंत्री महोदयांनी या प्रश्नांची गंभीर दखल घेवून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच विभागाच्या सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भंडारेकरांना शुद्ध पाण्यासाठी किमान दोन वर्षे वाट पाहावी लागणार. या वक्तव्यावर माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी आक्षेप घेत जनतेच्या सहनशिलतेचा शासनाने अंत पाहू नये, असे सांगून प्रशासन हे जनतेसाठी आहे की त्यांच्या विरुद्ध आहे असा सवाल उपस्थित केला. माजी आमदार मधुकर कुकडे यांनी सुद्धा पिण्याच्या पाण्याइतका गंभीर प्रश्न दुसरा असूच शकत नाही असे सांगून हा प्रश्न ताबडतोब सोडविणे गरजेचे आहे अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पद्माकर टेंभुर्णीकर यांनी सामान्य जनतेला शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार नाही काय? असा प्रश्न करून शासनाने युद्ध पातळीवर या कामास प्राधान्य देवून हा प्रश्न संबंधित विभागांच्या समन्वयातून सोडवावा अशी मागणी केली. मंत्रीमहोदयांनी या सर्व प्रश्नांची गंभीरपणे दखल घेतली आणि ताबडतोब कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी महासचिव रमाकांत पशिने, युवा अध्यक्ष तुषार हटेवार, शहर अध्यक्ष प्रमोद मानापुरे, मिडीया अध्यक्ष सारंग तिडके, युवा उपसचिव मयूर निंबार्ते, वासुदेवराव नेवारे, अविनाश पनके, गणेश धांडे, अर्जून सूर्यवंशी, केशव हुड, दामोदर क्षीरसागर, विजय दुबे, अरविंद ढोमणे, भारत चौधरी, शुभम भिवगडे, देवदास गभणे तसेच बरेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भंडारा : नागनदीचे पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात मिसळून नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांनी राज्याचे जलसंपदा व खारभूमी मंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा पाणी पुरवठ्याचे मुख्यस्त्रोत वैनगंगा नदी असून जलशुद्धीकरण केंद्र सुद्धा आहे. वैनगंगा नदीवर गोसे येथे गोसीखुर्द बंधारा बांधण्यात आलेला असून या बंधाऱ्यामध्ये सन २०१३ पासून पाणी साठविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. यामुळे नदीच्या पात्रामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतीची उत्त्पत्ती होत असून नदीच्या पात्रातील पाणी हे दूषित होत असल्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथून वाहणारी नागनदीद्वारे शहरातील निघणारे गटारीचे पाणी पुढे जावून वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये मिळसळ असते. यामुळे सुद्धा वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती वाढत आहे. त्यामुळे सुद्धा दूषित पाणी होत असल्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे. या बाबीमुळे नदी काठावरील वास्तव्य करणाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याबद्दल नागरिक मत व्यक्त करीत आहे. शासन निर्णयानुसार नैसर्गिक स्त्रोत शासनाने आपल्या अधिनस्त केल्यामुळे वैनगंगा नदी सुद्धा ही शासनाच्या अधिनस्त आलेली आहे. वैनगंगा नदीच्या पात्रातून पाणी उचल करण्याबाबत लघुपाटबंधारे विभागाकडून प्राप्त होणाऱ्या देयकापोटी भंडारा नगरपरिषदेने माहे मार्च २०१६ मध्ये रु. ४०.०० लक्षचा भरणा केलेला आहे. नागनदीद्वारे प्रवाहित होणाऱ्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून शुद्ध पाणी नदीच्या पत्रात सोडण्यात यावे, तसेच नदीच्या पात्रात असलेली वनस्पतीची साफसफाई लघुपाटबंधारे विभागामार्फत तातडीने करण्याबाबतचे निर्देश आपल्या स्तरावर देण्याबाबतची कारवाई करावी अशी मागणी नगराध्यक्ष बागडे यांनी निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)