शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या नोंदणीसाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 6:00 AM

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची उद्दीष्ट तीन दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात पुर्ण करण्यात यावे असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या ग्रामपंचायीत केंद्र चालकांचा संप सुरू आहे. अशावेळी शासनाच्या इतर यंत्रणांमार्फत नोंदणी करून घेण्याबाबत त्यांनी सुचना केल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : भंडारा, मोहाडी व साकोली येथे उपविभागस्तरीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे. १८ ते ४० वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (एसएमएफ) या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी २३, २४ व २५ ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात याव, या सोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व आयुष्यमान भारत या योजनेची नोंदणी प्राधन्याने करण्यात यावी, या साठी गावचे सरपंच, तलाठी, कृषी सहायक, ग्रामरोजगार सेवक, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य घेण्यात यावे. या योजनेच्या नोंदणीमधून कुठलाही पात्र लाभार्थी सुटता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा, मोहाडी व साकोली या ठिकाणी संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांचा उपविभागीय स्तरावर बैठक घेवून आढावा घेतला. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हान, तहसिलदार अक्षय पोयाम, गजानन कोकड्डे व अधिकारी उपस्थित होते.प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची उद्दीष्ट तीन दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात पुर्ण करण्यात यावे असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या ग्रामपंचायीत केंद्र चालकांचा संप सुरू आहे. अशावेळी शासनाच्या इतर यंत्रणांमार्फत नोंदणी करून घेण्याबाबत त्यांनी सुचना केल्या. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करून मानधन योजनेसाठी अधिकाअधिक नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या कामात अडथळा आणणºयावर कार्यवाही करण्याचे संकेत त्यांनी दिले. यासोबतच आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करण्यात यावी असे सांगितले. महसुल विभागाच्या कर्मचाºयांनी अभिलेख संगणकीय करण्याचे काम आठ दिवसात पुर्ण करावे असे ते म्हणाले.पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्यांचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुध्दा तरतुद या योजनेत आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी २३ ऑगस्ट ते २५ आॅगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, गांव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणावी. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी याबाबत सुविधा केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन केले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना